शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

खर्च केला किती मोठा; तरीही पदरी कमीच नोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST

मानोरी : येवला तालुक्यात शेतकरी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे देखील विक्रमी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून, सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या ...

मानोरी : येवला तालुक्यात शेतकरी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे देखील विक्रमी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून, सध्या टोमॅटोला मिळत असलेल्या कमी दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मिळणाऱ्या भावातून टोमॅटो पिकाला केलेला खर्च फिटणे देखील शेतकऱ्यांना दुरापास्त झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत असून अनेक शेतकऱ्यांनी आपला टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकून देत आपला रोष व्यक्त केला आहे.

येवला तालुक्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे उत्पादन घेत असतात. दरवर्षी काही का होईना; पण चांगल्या प्रकारे दर शेतकऱ्यांना मिळत असतो. मात्र, यावर्षी टोमॅटो पिकाला मिळत असलेला दर बघून बळीराजाच्या आर्थिक संकटात चांगली मोठी भर पडताना दिसून येत आहे. टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च निघणे देखील कठीण झाले असून कमी दराने टोमॅटो विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरवर्षी टोमॅटोला प्रतिकॅरेट सरासरी २०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यात १ क्रेट टोमॅटोला २० ते ५० रुपयांपासून भाव मिळत आहे. ह्या दरामुळे टोमॅटो पिकाचा लागवड खर्च फिटणे कठीण झाले असून, शेतकऱ्यांना गाडी भाडे खिशातून घालण्याची वेळ आली आहे. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी प्रतिएकर अंदाचे जवळपास दीड लाख रुपये इतका खर्च येत असतो. यात नांगरणी २२०० रुपये, रोटर मारण्यासाठी २२०० रुपये, सऱ्या पाडण्यासाठी १००० रुपये इतका दर शेतकऱ्यांना मोजावा लागतो. त्यात मल्चिंग पेपर टाकण्यासाठी ५००० रुपये, रोपांचा खर्च २० हजार रुपये, लागवडीसाठी खर्च ५००० रुपये, औषधांचा खर्च अंदाजे ७० हजार रुपये, टोमॅटो बांधणीसाठी बांबू व सुतळी याचाही इतर खर्च येत असतो. त्यात अजून टोमॅटोची तोडणी व वाहतूक खर्च हा अंदाजे ५० रुपये प्रतिकॅरेट इतका येत असतो. टोमॅटोच्या प्रतिकॅरेटला किती दर मिळेल याची शाश्वती नसली तरी तोडणी व वाहतूक हा अंदाजे ५० रुपये खर्च हा निश्चितच एका कॅरेटला द्यावा लागतो. एवढा सगळा खर्च झाला असताना देखील टोमॅटोला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असाच पुढेही दर मिळत राहिला तर टोमॅटो उत्पादकांना टोमॅटोची लागवड करणे कठीण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालावे व टोमॅटो पिकाला तसेच इतरही पिकांना चांगल्या पद्धतीने भाव मिळेल व शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अशा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

इन्फो

रस्त्याच्या कडेला फेकले जात आहेत टोमॅटो....

टोमॅटोला कमी दर मिळत असल्याने हतबल झालेला शेतकरी आपले टोमॅटो रस्त्याच्या कडेला टाकून देत असल्याचे दिसून येत आहे. तसेच टोमॅटोला मिळत असलेला दर बघून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नसल्याने शेतकरी टोमॅटो तोडणी न करण्यास पसंती देत असून झाडालाच टोमॅटो लाल होऊन नंतर तो तोडून रस्त्याच्या कडेला फेकले जात आहेत. सध्या ग्रामीण भागात असलेल्या सर्व रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात टोमॅटो फेकून दिल्याचे ढिगारे दिसून येत आहेत.

कोट....

शेतकऱ्यांचे आर्थिक भवितव्य हे पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने आमचा यातून साधा उत्पादन खर्च देखील फिटत नाही. टोमॅटो तोडणीला येणाऱ्या मजुरांचा खर्च आणि गाडी भाडे या दोन गोष्टीला मोठ्या प्रमाणात खर्च येत असून, यातून टोमॅटोला मिळणाऱ्या दरातून तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्च देखील फिटत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

- कल्याण कोटकर, टोमॅटो उत्पादक शेतकरी, शिरसगाव लौकी.

फोटो : २७ टोमॅटो

कवडीमोल दरामुळे शिरसगाव लौकी येथे रस्त्याच्या कडेला फेकलेले टोमॅटो.