शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मुसळगावच्या विस्कळीत वीजपुरवठ्याने ग्रामस्थ हैराण

By admin | Updated: May 24, 2014 12:10 IST

मुसळगाव : सिन्नर तालुक्यातल्या मुसळगाव व परिसरात वारंवार विस्कळीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिक हैराण झाले आहेत.

मुसळगाव : सिन्नर तालुक्यातल्या मुसळगाव व परिसरात वारंवार विस्कळीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे शेतकर्‍यांसह नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीकडे चौकशी केल्यावर वीजपुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात वीजपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मुसळगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर चोरटे अंधाराचा फायदा घेत चोर्‍या करीत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीने या भागातील वीजपुरवठा खंडित करूनये, अशी मागणी अनेकदा करूनही त्याकडे वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुसळगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी नसल्याने विजेची मागणी कमी झाली आहे, असे असतानाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. येथे सिंगलफेज योजना यापूर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. येथील भुरट्या चोर्‍या रोखण्यासाठी सध्या रात्रीच्या वेळी सिंगलफेज योजनेचा पुरवठाच खंडित होत असल्याने वीज कंपनीने त्यातील त्रुटी दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली आहेत. (वार्ताहर)