शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

झोपडपट्टीतील रहिवाशांची घरकुले भाडेतत्त्वावर

By admin | Updated: August 5, 2016 01:35 IST

भारतनगर : झोपडपट्टीमुक्त योजनेस खोडा

इंदिरानगर : शहर झोपडपट्टीमुक्त होण्यासाठी लाभार्थ्यांना घरकुल योजनेंतर्गत घरकुले देण्यात आली. परंतु भारतनगर व चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ते पुन्हा झोपडीमध्येच राहण्यास आल्याने शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास खोडा बसणार आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी शिवाजीवाडी, भारतनगर, नंदिनीनगरसह परिसरातील वसाहतींमध्ये महापालिकेच्या वतीने घरकुल योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या झोपड्यांची पाहणी केली. त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे जमाही करण्यात आली होती. त्याप्रमाणे गेल्या वर्षात दोन टप्प्यात भारतनगरलगतच्या घरकुल योजनेतील घरांचे सोडत पद्धतीने क्रमांक काढून घरे वाटप करण्यात आली होती. तसेच भगतसिंग वसाहतीमध्ये दोन वर्षांपूर्वी मनपाच्या वतीने लाभार्थ्यांची पाहणी करून यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार चेतनानगरलगत असलेल्या घरकुल योजनेतील घरे वाटप करण्यात आली. परंतु भारतनगर आणि चेतनानगरलगतच्या घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांनी सुमारे एक ते दोन महिने मनपाच्या वतीने घरात मालक राहता का नाही, याची तपासणी केली असता काही घरे सुमारे १५०० रुपये भाडेतत्त्वावर दिली असल्याचे आढळले. स्वत: मात्र पुन्हा झोपड्यांमध्ये पूर्वीच्या जागेवर राहात असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासन व मनपाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून शहर झोेपडपट्टीमुक्त करण्याचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)