शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

घरगुती ग्राहकांना बसणार दरवाढीचा ‘शॉक

By admin | Updated: February 19, 2015 00:31 IST

’महावितरणचा प्रस्ताव : एप्रिलपासून अंमलबजावणी शक्य

नाशिक : महावितरण कंपनीने आर्थिक तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. प्रस्तावित दरवाढीनुसार घरगुती ग्राहकांना सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या वीजबिलात १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महावितरणने सादर केलेल्या दरवाढीच्या प्रस्तावानुसार घरगुती वीजवापराचे प्रस्ताव बदलून ग्राहकांसाठी विविध श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ० ते ७५, ७६ ते १२५, १२६ ते ३०० युनिट वापरणाऱ्या वीजग्राहकांना स्वतंत्र श्रेणीत आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या नव्या श्रेणीमुळे घरगुती ग्राहकांवर मोठी दरवाढ लादली जाणार आहे. ० ते ७५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ४.१६ रु. प्रति युनिट याप्रमाणे दर आकारला जाणार आहे. तर ७६ ते १२५ युनिट वीज वापरणाऱ्यांना ५.५५ रु. प्रति युनिट इतका दर प्रस्तावित आहे. तर १२६ ते ३०० युनिटसाठी ७.१० रु. असा दर ठरविण्यात आला आहे.महावितरणने यंदाच्या दरवाढीत घरगुती ग्राहकांवर दरवाढ लादल्यामुळे या दरवाढीस मोठा विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित दरवाढ लागू करण्यापूर्वी राज्यभर वीज नियामक आयोग सुनावणी करणार असून, महावितरणच्या या प्रस्तावावर वाशी, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक येथे जनसुनावणी होणार आहे.दरम्यान, दरवाढीसंदर्भात केवळ तोट्याचे कारण दाखविल्यामुळे महावितरण अडचणीत येण्याची शक्यता आहे. यापूर्वी न्यायालयाने महावितरणला थकबाकीदारांकडील वसुली करण्याचे आदेशीत केले होते, मात्र थकबाकी वसुली न करताच तोट्याचे कारण दाखविण्यात आल्यामुळे प्रस्तावित दरवाढ काहीअंशी कमी करण्यासाठी ग्राहक मंडळे जनसुनावणीत बाजू मांडणार आहेत. या सर्व शहरांमध्ये जनसुनावणी झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल-मे मध्ये नवीन दरवाढीचा अंतिम मसुदा तयार होण्याची शक्यता आहे. महावितरणने दाखल केलेल्या वीजदरवाढीच्या प्रस्तावात ८ ते १० टक्के वाढ सुचविली आहे. मात्र गेल्या वर्षभरात महावितरणने ग्राहकांवर अधिभार लादल्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात अगोदरच वाढ झालेली आहे. दरवाढीच्या प्रस्तावापूर्वी ग्राहकांकडून विविध शिर्षाखाली वसूल केलेल्या दराची वजावट होणार आहे का, असा प्रश्न आताच ग्राहक पंचायतीने उपस्थित केला आहे. दरम्यान, दरवाढ प्रस्तावापूर्वीच मुंबईत झालेल्या सुनावणीत राज्यातील तमाम वीजग्राहक संघटनांनी या दरवाढीच विरोध करत वीजबिलात सुसूत्रता आणावी, वसूल करण्यात येणाऱ्या शिर्षाची स्पष्ट माहिती ग्राहकांना द्यावी, अशी बाजू मांडली होती. शिवाय अगोदर पूर्ण थकबाकी वसुली करावी त्यानंतरच दरवाढ सूचविण्यात यावी, असाही मुद्दा मांडला होता. मात्र वसुली न होताच महावितरणने प्रस्ताव पुढे रेटला आहे. (प्रतिनिधी)