शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोरोनाच्या उच्चाटनासाठी घरोघरी ‘दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:15 IST

--- नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ ...

---

नाशिक : मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान पर्व सध्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. रविवारी (दि.९) या पर्वाचा २६ वा उपवास (रोजा) समाजबांधवांनी पूर्ण केला. यानंतर संध्याकाळचे नमाज पठण पार पडल्यानंतर ‘शब ए कद्र’ला प्रारंभ झाला. यानिमित्ताने घरोघरी पारंपरिक पद्धतीने नमाज, कुराण धर्मग्रंथाचे आबालवृद्धांनी पठण करत कोरोनासारख्या आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे याकरिता ‘दुवा’ मागितली. शासनाच्या निर्बंधांचे पालन करत कुठल्याही मशिदींमध्ये सामूहिक सोहळा पार पडला नाही.

धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असलेल्या ‘शब ए कद्र’ची मोठी रात्र शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. मशिदींवर करण्यात आलेल्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. जुने नाशिक, वडाळारोड, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदी भागातील मशिदींना रोशणाईने झळाळी प्राप्त झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, या रात्रीच्या औचित्यावर विविध भागांमध्ये शाळकरी चिमूकल्यांनीसुद्धा निर्जळी कडक उपवास केला.

दरवर्षी रमजान पर्वाचा २६वा उपवास सोडल्यानंतर शब ए कद्र साजरी केली जाते. या रात्रीच्या औचित्यावर मशिदींमधून विविध धार्मिक धार्मिक कार्यक्रम होतात. समाजबांधव एकत्रितपणे कुराण पठण करतात आणि अल्लाहच्या दरबारी दुवा मागतात. तसेच मशिदीचे मौलवी, सेवेकरी (खादीम) यांचा विश्वस्तांकडून सत्कार केला जातो. कोरोनाचे सावट असल्याने हा सोहळा यंदाही कोणत्याही मशिदीत पार पडला नाही. धर्मगुरूंचे प्रवचनही झाले नाही.

या रात्रीत धर्मग्रंथ कुराण पृथ्वीतलावर अवतरीत करण्यात आल्याचे धर्मगुरूंकडून सांगितले जाते. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या रात्रीवर कोरोनाचे सावट राहिले. कोरोनाच्या साथीमुळे शासनाच्या वतीने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कडक निर्बंधांमुळे या विशेष रात्रीलाही मशिदींमध्ये नमाजपठण झाले नसल्याचे शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितले.