शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

गोदाकाठ परिसरात हुडहुडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:13 IST

थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.

ठळक मुद्देपिकांवर हिमकण : २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद; द्राक्षबागांना फटका

लासलगाव/निफाड/खेडलेझुंगे : तालुक्यात थंडीची तीव्रता पुन्हा वाढली असून, शुक्रवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड तालुक्यात किमान तापमान २.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले असून, परिसर थंडीने गारठला आहे.गेल्या चार ते पाच दिवसांपासून निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे गोदावरी किनाऱ्यावरील खेडलेझुंगे, रूई, थडीसारोळे, कोळगाव, कानळद आदी गावांसह परिसर गारठला आहे. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा निफाड तालुक्यात परतली आहे. थंडीमुळे शेतपिकांवर दवबिंदू साचलेले आहे. आजच्या नीचांकी तापमानामुळे पिकांवर हिमकण आढळून आले आहेत. परिसरात पहाटे धुके दाटून येते. शुक्रवारी तर पाण्यातून वाफा निघताना दिसून येत होत्या. एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा निफाड तालुक्यात राज्यातील सर्वात नीचांकी तपमानाची नोंद शुक्रवारी झाली. परिसरातील वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे. तसेच महिलावर्गहीस्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. परिसरात थंडीचा जोर वाढत असून, नागरिकांनी उबदारकपड्यांचा आधार घेण्यास सुरु वात केली आहे. गेल्या पंधरवड्यात थंडीने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात परिसरातील किमान तापमान आठ अंशाच्या जवळपास राहिले होते. दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, पेपर विक्रेते, सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते.द्राक्षमण्यांना तडे, उत्पादक चिंतित...गुरु वारी ९.२ अंशावर असणारे तापमान दुपारनंतर खाली येऊ लागले अन् सायंकाळी गाव वाडी-वस्तीवर शेकोट्या पेटल्या. अवघा तालुका थंडीने गारठला आहे. शुक्रवारी सकाळी कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर २.४ अंश तापमानाची नोंद झाली. तापमानात अचानक घट झाल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाला असून, द्राक्षमण्यांना तडे जाणे, पाने सुकणे, मुळ्याची वाढ खुंटणे असे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे बागेत चिपाटे पेटवून ऊब तयार करीत आहे. मात्र वाढती थंडी गहू, कांदा, हरभरा पिकांसाठी पोषक ठरू लागली आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन