शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

हुडहुडी भरली, शेकोट्यांनी धरला जोर!

By admin | Updated: December 24, 2015 00:18 IST

त्र्यंबकेश्वर : ‘ऊबदार’ कपडे निघाले बाहेर

त्र्यंबकेश्वर : येथे २/३ दिवसांपासून थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढला असून येणाऱ्या भाविकांसह स्थानिकांसदेखील हुडहुडीने घेरले आहे. लोकांच्या अंगावर गरम कपड्यात वाढ झाली आहे. तर दिवसादेखील नागरिक गरम व उबदार कपडे घालून वावरत आहेत.साधारणत: दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत ऊन लागते त्यानंतर मात्र ऊन असूनही गार वारे अंगाला झोंबू लागते. थंडी वाजायला सुरवात होते. तर सायंकाळी ५ नंतर तर जोरदार थंडी वाजते दिवस लहान अशल्याने सूर्यही सायंकाळी सहाच्या सुमारास मावळतो. तर दुसऱ्या दिवशी सहा-साडेसहाला सूर्योदय झाल्यानंतरही थंडी कायम असते.सध्या तापमान सहा ते सात अंश डिग्री सेल्सीयसपर्यंत उतरले आहे. अजूनही उतरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिकांचा अनुभव आहे की श्रीनिवृत्तीनाथ यात्रेपर्यत थंडी जास्तच असते. येणारे भाविक यात्रेकरू थंडीने कुडकुडतात. आताही त्र्यंबकेश्वरला येणारे यात्रेकरू थंडीने कुडकुडतच दर्शन घेत आहेत. सध्या स्थानिक नागरिकदेखील रात्री ८.०० वाजेपर्यंत आपापले व्यवहार पूर्ण करून लवकर घरी जाणे पसंत करतात.ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहे. बच्चे कंपनी व मोठी माणसे शेकोट्या भोवती बसतात. सकाळी सकाळी फिरायला जाणाऱ्यांची गर्दीही वाढू लागली आहे. पहाटे पडणारे धुके तर रात्रीची गुलाबी थंडी काही जणांना मात्र हवीहवीशी वाटते पांघरुणातून त्यांना उठावेसेच वाटत नाही.