शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विवाह सोहळ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:49 IST

कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही टेन्शन कायम असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवधू-वर पित्यांमध्ये चिंता : रिफंड मिळूनही टेन्शन कायम

नांदूरवैद्य : कोरोनामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे स्थगित झाल्याने वधू-वर पित्यांमध्ये चिंंता व्यक्त केली जात आहे. त्यातच अनेकांनी घराच्या दारात मांडव टाकत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नविधी पार पाडले आहेत तर अनेकांना कार्यालय बुकिंगचे रिफंड मिळूनही टेन्शन कायम असल्याचे दिसून येत आहे.कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील विविध शहरी भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. ग्रामीण भागातील यात्रोत्सव, सभारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच आता केंद्र शासनाच्या १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाउनमुळे विवाह सोहळ्यांसह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आलेले आहेत, त्यामुळे कधी हे विघ्न जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लग्नसोहळ्यांचा थाट विशेषत: ग्रामीण भागात अधिक असतो. फेब्रुवारी, मार्चपासून सुरू होणारे लग्न सोहळे अगदी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतात. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेकडो वर-वधूंचे लग्न ठरले आहे, मात्र कोरोनामुळे हे लग्नसोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी मनमानी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर असे ग्रामीण भागातील चित्र आहे.दरम्यान, या लग्नसोहळ्यामुळे केटरर्सकडे कामाला आलेले आचारी, कामगार, वाढपी, डेकोरेशनवाले, वाजंत्री, बॅँडवाले, कार्यालय चालक, मंडपवाले व त्यांचे कामगार यांचे रोजगार बुडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर काही वधू- वरांची लग्न तारीख ठरली असूनही, लग्न मात्र करता येत नसल्यामुळे वधू पित्याची चिंंता वाढवणारी ठरत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.अनेक वधू पित्यांनी लॉकडाउन होण्याअगोदरच अगदी साधेपणाने लग्न उरकण्यावर भर दिला होता. अशा लग्न सोहळ्यांसाठी अत्यंत कमी लोक जमा झाल्याने मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेशन, बॅँड आणि जेवणावळींचा फार मोठा खर्च वाचला आहे. लग्नसोहळे अत्यंत साधेपणाने दारासमोरच किंवा गावातील मंदिरात उरकण्यात आले. त्यामुळे ज्या वधू पक्ष किंंवा वर पक्षाकडे लग्नसोहळा पार पाडण्याचे ठरले होते ते त्यांच्या लग्नाचा होणारा अनाठायी खर्च वाचला आहे. त्यामुळे कही खुशी, कही गम व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न