शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

भीमोत्सवात उमटला चळवळीचा इतिहास

By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे.

नाशिक : आंबेडकरी चळवळीत भीमगीतकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे. त्यांच्यामधील त्याग, समर्पण यातूनच ही चळवळ समृद्ध झाली. या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले. गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.९) ब्ल्यू लायन फाउंडेशन आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सवात उद्घाटक म्हणून डॉ. कांबळे बोलत होते. याप्रसंगी डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण महत्त्वाचा असतो. आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देण्यासाठी गेल्या ५0 वर्षात भीमगीतकार, आंबेडकरी शाहीर आणि जलसाकार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आंबेडकरी चळवळ शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या कलावंतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करून परिवर्तनाची चळवळ वेगवान केली आहे. सत्यशोधकी जलसाचा वारसा स्वीकारून आंबेडकरी जलसाने मनोरंजनाऐवजी अंधश्रद्धेवर प्रहार करीत समाज प्रबोधनाचे कार्य केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी अविनाश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे होते. याप्रसंगी प्रा. अहिरे यांनी मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्त आंबेडकरी बाण्याचे कवी व शाहीर यांच्या चळवळीतील योगदानाला उजाळा देण्यासाठी या भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने या कार्याला एकप्रकारे नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. याप्रसंगी उद्घाटन सत्रात बुद्धभूषण साळवे यांच्या बाजार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नितीन भुजबळ, अजित अभंग, कैलास दाभाडे, कविता थोरात आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बागुल व किशोर शिंदे यांनी केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.