शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

भीमोत्सवात उमटला चळवळीचा इतिहास

By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे.

नाशिक : आंबेडकरी चळवळीत भीमगीतकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे. त्यांच्यामधील त्याग, समर्पण यातूनच ही चळवळ समृद्ध झाली. या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले. गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.९) ब्ल्यू लायन फाउंडेशन आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सवात उद्घाटक म्हणून डॉ. कांबळे बोलत होते. याप्रसंगी डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण महत्त्वाचा असतो. आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देण्यासाठी गेल्या ५0 वर्षात भीमगीतकार, आंबेडकरी शाहीर आणि जलसाकार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आंबेडकरी चळवळ शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या कलावंतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करून परिवर्तनाची चळवळ वेगवान केली आहे. सत्यशोधकी जलसाचा वारसा स्वीकारून आंबेडकरी जलसाने मनोरंजनाऐवजी अंधश्रद्धेवर प्रहार करीत समाज प्रबोधनाचे कार्य केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी अविनाश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे होते. याप्रसंगी प्रा. अहिरे यांनी मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्त आंबेडकरी बाण्याचे कवी व शाहीर यांच्या चळवळीतील योगदानाला उजाळा देण्यासाठी या भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने या कार्याला एकप्रकारे नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. याप्रसंगी उद्घाटन सत्रात बुद्धभूषण साळवे यांच्या बाजार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नितीन भुजबळ, अजित अभंग, कैलास दाभाडे, कविता थोरात आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बागुल व किशोर शिंदे यांनी केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.