शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

कळवण तालुक्यातील हिरवे गाव : लोकसहभागातून १०० टक्के हगणदारीमुक्त, स्वच्छतेकडून समृद्धीकडे भैताणे दिगरची आदर्श गावाकडे यशस्वी वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:18 IST

कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग...

ठळक मुद्देस्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल सुरू पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना

कळवण : संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग, स्वच्छ भारत अभियानांतर्गतच्या शौचालयांना गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग... लोकसहभागातून संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणारे कळवण तालुक्यातील भैताणे दिगर या गावाने विकासाकडे वाटचाल सुरू केली असून, शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा घेत गावाने सर्वच क्षेत्रात प्रगती केल्यामुळे सध्या हे गाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. लोकसहभागातून संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात तिसरा क्रमांक, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियानाचे बक्षीस यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या भैताणे दिगर या आदिवासी गावाने १०० टक्के गाव हगणदारीमुक्त करून स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल सुरू केली आहे. कळवण आदिवासी तालुक्यातील पश्चिम, दुर्गम भागातील भैताणे दिगर या आदिवासी गाव. एकूण ११८२ इतकी लोकसंख्या असलेल्या भैताणे दिगरने १०० टक्के हगणदारीमुक्त करून तालुक्यात आदर्श निर्माण केला असून, आदर्श गावाकडे वाटचाल सुरू केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना राबवून गाव स्वच्छतेतून समृद्धीकडे नेले आहे. या ग्रामपंचायतींतर्गत शेरी दिगर हे गाव समाविष्ट असून, दोन्ही गावे डोंगर टेकडीवर वसलेली आहेत. त्यामुळे गावाच्या सौंदर्यात नैसर्गिक भर पडली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्याबरोबरच सरपंच पोपट गायकवाड यांनी पाणी, रस्ते, शिक्षण, सिंचन, वीज, आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मौजे भैताणे दिगर येथे सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाले असून, शेरी दिगर येथील सभामंडपाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. गावासाठी उपसरपंच बेबीबाई पवार, सुमनबाई पालवी, झेलूबाई ठाकरे, चंदर पवार, आनंदा देशमुख, राधाबाई पवार, शिक्षक वाघ, बिरारी, सोमनाथ गायकवाड , अंबादास देशमुख, कृष्णा ठाकरे आदींसह ग्रामस्थ विकासाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकत आहेत. गावाचे खास वैशिष्ट म्हणजे संपूर्ण गावातील घरांना एकसारखा हिरवा रंग देण्यात आला आहे. शौचालयाला गुलाबी, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गतच्या शौचालयांना पिवळा रंग असा एक नवीन पॅटर्न पोपट गायकवाड यांनी सुरु केला आहे.़़़म्हणून बांधले प्रत्येक घरी शौचालयगाव हगणदारीमुक्त होण्यापूर्वी गावातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ‘प्रत्येक घरी देवालय ..म्हणून आम्ही बांधले प्रत्येक घरी शौचालय’ असा पण केला व २०१६ साली गाव हगणदारीमुक्त झाले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायतीला ६६ लाभार्थींना १२ हजारप्रमाणे ७ लाख ५२ हजार रु पये इतके प्रोत्साहन अनुदान, तर रोजगार हमी योजनेअंतर्गत १२ हजार प्रमाणे ५८ लाभार्थींनी वैयक्तिक शौचालय बांधून अनुदान मिळविले आहे. गावातील कचºयाचे विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ठिकठिकाणी मोठ्या कचराकुंडी तसेच भूमिगत शोषखड्डे केले आहेत.