शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका लांबणीच्या शक्यतेने इच्छुकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हळूहळू मूळ धरू लागल्यामुळे आता ही न्यायालयीन लढाई रस्त्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारनेच ...

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हळूहळू मूळ धरू लागल्यामुळे आता ही न्यायालयीन लढाई रस्त्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारनेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तसेच समता परिषदेसह अन्य ओबीसी संघटनांनीही न्यायालयात लढाई लढण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे या प्रश्नावरून वातावरण तापू लागले असून, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील निवडणुका न होऊ देण्याचा इशारा दिल्यामुळे या निवडणुका मुदतीत होतील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कोरोनाचा सुरू असलेला कहर यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्याही निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या, आता मात्र कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आल्यासारखे असल्यामुळे पुढच्यावर्षी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागल्याने इच्छुक मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत. प्रभागात, गटात व गणात चाचपणी केली जात असून, साऱ्यांचे लक्ष मात्र ओबीसी आरक्षणाकडे लागले आहे. हा प्रश्न लवकर सुटावा अशी साऱ्यांचीच इच्छा असली तरी, आता सत्ताधारी व विरोधी पक्ष देखील निवडणुका न होऊ देण्याची भाषा करीत असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

चौकट

===

न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे, ते न्यायालयानेच बहाल करावे, अशी अपेक्षा आहे. हजारोंच्या संख्येने ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रश्न सुटेपर्यंत एक तर निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, आहे तीच परिस्थिती कायम ठेवावी किंवा न्यायालयाने आरक्षण बहाल करावे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

=====

चौकट==

आरक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष

सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्वच प्रवर्गाचे आरक्षण जाहीर केले जाते व त्यावरच उमेदवारांची गणिते ठरतात. मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.