शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

निवडणुका लांबणीच्या शक्यतेने इच्छुकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हळूहळू मूळ धरू लागल्यामुळे आता ही न्यायालयीन लढाई रस्त्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारनेच ...

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हळूहळू मूळ धरू लागल्यामुळे आता ही न्यायालयीन लढाई रस्त्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारनेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तसेच समता परिषदेसह अन्य ओबीसी संघटनांनीही न्यायालयात लढाई लढण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे या प्रश्नावरून वातावरण तापू लागले असून, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील निवडणुका न होऊ देण्याचा इशारा दिल्यामुळे या निवडणुका मुदतीत होतील, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात कोरोनाचा सुरू असलेला कहर यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्याही निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या, आता मात्र कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आल्यासारखे असल्यामुळे पुढच्यावर्षी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागल्याने इच्छुक मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत. प्रभागात, गटात व गणात चाचपणी केली जात असून, साऱ्यांचे लक्ष मात्र ओबीसी आरक्षणाकडे लागले आहे. हा प्रश्न लवकर सुटावा अशी साऱ्यांचीच इच्छा असली तरी, आता सत्ताधारी व विरोधी पक्ष देखील निवडणुका न होऊ देण्याची भाषा करीत असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.

चौकट

===

न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे, ते न्यायालयानेच बहाल करावे, अशी अपेक्षा आहे. हजारोंच्या संख्येने ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे प्रश्न सुटेपर्यंत एक तर निवडणुका लांबणीवर टाकाव्यात, आहे तीच परिस्थिती कायम ठेवावी किंवा न्यायालयाने आरक्षण बहाल करावे.

- रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

=====

चौकट==

आरक्षणाकडे साऱ्यांचेच लक्ष

सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सर्वच प्रवर्गाचे आरक्षण जाहीर केले जाते व त्यावरच उमेदवारांची गणिते ठरतात. मात्र ओबीसींच्या आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.