शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्मासाठी ‘घरवापसी’ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 23:40 IST

गोविंदगिरी देव : धर्मजागरण विभाग वनवासी संमेलनात प्रतिपादन

नाशिक : हिंदू धर्मामुळेच जगात शांतता नांदत असून, ती कायम ठेवण्यासाठी धर्माला बळकटी देणे गरजेचे आहे. त्यासाठी धर्मांतरितांची ‘घरवापसी’ गरजेची असल्याचे प्रतिपादन गोविंदगिरी देव महाराज यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय हिंदू वनवासी बांधवांच्या संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंचवटी महाविद्यालयात हे संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर आचार्य विश्वेश्वरदास, अमृतदासजी महाराज, साध्वी अमितज्योती, रामकृष्ण लहवितकर महाराज, स्वामी गोपालाचार्य, क्षेत्रीय धर्मजागरणप्रमुख शरद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंदगिरी देव म्हणाले, आजवर अनेकदा बाहेरच्या प्रवृत्तींकडून हिंदू धर्मावर आघात झाले; मात्र त्याला तोंड देऊन हिंदू धर्म नुसता टिकलाच नाही, तर आणखी तेजस्वी झाला. हिंदू धर्मात अनेक जाती-पाती, पंथ असले, तरी धर्म एकच आहे. आता सर्व धर्म सारखेच असे सांगितले जाते; मात्र त्यात तथ्य नाही. सनातन वैदिक धर्म हा जगात एकमेव असून, त्याला मोठे महत्त्व आहे. धर्मासाठी प्राण द्यावे लागले, तरी हरकत नाही, असे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. त्यामुळे धर्म बळकटीकरणासाठी सतत प्रयत्न व्हावेत.साध्वी अमितज्योती म्हणाल्या, हिंदू धर्माची शक्ती कमी करण्यासाठी परकीय शक्तींनी जिवापाड प्रयत्न केले; मात्र हिंदू धर्म अखंड राहिला. हिंदू संघटित राहिले, तर कोणी काही वाकडे करू शकणार नाही. रामानुजाचार्य यांनी हिंदू धर्मकार्य हे ईश्वरीय असून, वाट चुकलेल्या बांधवांना पुन्हा स्वधर्मात आणणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. धर्मजागरण सहप्रमुख राजेंद्रसिंह यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, संमेलनात उद्या (दि. १६) सकाळी ८ वाजता वनवासी बांधव पुन्हा मिरवणुकीने स्नानासाठी जाणार आहेत.

४0 हजार बांधवांची घरवापसीसंमेलनात शरद ढोले यांनी घरवापसी उपक्रमाची माहिती दिली. सन २000 पासून धर्मजागरण विभाग सुरू करण्यात आला असून, गेल्या पंधरा वर्षांत नाशिकच्या दोनशे किलोमीटर परिघातील सुमारे ४0 हजार वनवासी बांधवांची अन्य धर्मांतून हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. यांपैकी आठ हजार बांधव सदर संमेलनाला आले असून, त्यांनी तीर्थस्नान केल्याचे ढोले यांनी सांगितले.