शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

हिंदू धर्मासाठी ‘घरवापसी’ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 23:40 IST

गोविंदगिरी देव : धर्मजागरण विभाग वनवासी संमेलनात प्रतिपादन

नाशिक : हिंदू धर्मामुळेच जगात शांतता नांदत असून, ती कायम ठेवण्यासाठी धर्माला बळकटी देणे गरजेचे आहे. त्यासाठी धर्मांतरितांची ‘घरवापसी’ गरजेची असल्याचे प्रतिपादन गोविंदगिरी देव महाराज यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय हिंदू वनवासी बांधवांच्या संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंचवटी महाविद्यालयात हे संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर आचार्य विश्वेश्वरदास, अमृतदासजी महाराज, साध्वी अमितज्योती, रामकृष्ण लहवितकर महाराज, स्वामी गोपालाचार्य, क्षेत्रीय धर्मजागरणप्रमुख शरद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंदगिरी देव म्हणाले, आजवर अनेकदा बाहेरच्या प्रवृत्तींकडून हिंदू धर्मावर आघात झाले; मात्र त्याला तोंड देऊन हिंदू धर्म नुसता टिकलाच नाही, तर आणखी तेजस्वी झाला. हिंदू धर्मात अनेक जाती-पाती, पंथ असले, तरी धर्म एकच आहे. आता सर्व धर्म सारखेच असे सांगितले जाते; मात्र त्यात तथ्य नाही. सनातन वैदिक धर्म हा जगात एकमेव असून, त्याला मोठे महत्त्व आहे. धर्मासाठी प्राण द्यावे लागले, तरी हरकत नाही, असे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. त्यामुळे धर्म बळकटीकरणासाठी सतत प्रयत्न व्हावेत.साध्वी अमितज्योती म्हणाल्या, हिंदू धर्माची शक्ती कमी करण्यासाठी परकीय शक्तींनी जिवापाड प्रयत्न केले; मात्र हिंदू धर्म अखंड राहिला. हिंदू संघटित राहिले, तर कोणी काही वाकडे करू शकणार नाही. रामानुजाचार्य यांनी हिंदू धर्मकार्य हे ईश्वरीय असून, वाट चुकलेल्या बांधवांना पुन्हा स्वधर्मात आणणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. धर्मजागरण सहप्रमुख राजेंद्रसिंह यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, संमेलनात उद्या (दि. १६) सकाळी ८ वाजता वनवासी बांधव पुन्हा मिरवणुकीने स्नानासाठी जाणार आहेत.

४0 हजार बांधवांची घरवापसीसंमेलनात शरद ढोले यांनी घरवापसी उपक्रमाची माहिती दिली. सन २000 पासून धर्मजागरण विभाग सुरू करण्यात आला असून, गेल्या पंधरा वर्षांत नाशिकच्या दोनशे किलोमीटर परिघातील सुमारे ४0 हजार वनवासी बांधवांची अन्य धर्मांतून हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. यांपैकी आठ हजार बांधव सदर संमेलनाला आले असून, त्यांनी तीर्थस्नान केल्याचे ढोले यांनी सांगितले.