शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

हिंदू धर्मासाठी ‘घरवापसी’ गरजेची

By admin | Updated: September 15, 2015 23:40 IST

गोविंदगिरी देव : धर्मजागरण विभाग वनवासी संमेलनात प्रतिपादन

नाशिक : हिंदू धर्मामुळेच जगात शांतता नांदत असून, ती कायम ठेवण्यासाठी धर्माला बळकटी देणे गरजेचे आहे. त्यासाठी धर्मांतरितांची ‘घरवापसी’ गरजेची असल्याचे प्रतिपादन गोविंदगिरी देव महाराज यांनी केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय हिंदू वनवासी बांधवांच्या संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पंचवटी महाविद्यालयात हे संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर आचार्य विश्वेश्वरदास, अमृतदासजी महाराज, साध्वी अमितज्योती, रामकृष्ण लहवितकर महाराज, स्वामी गोपालाचार्य, क्षेत्रीय धर्मजागरणप्रमुख शरद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. गोविंदगिरी देव म्हणाले, आजवर अनेकदा बाहेरच्या प्रवृत्तींकडून हिंदू धर्मावर आघात झाले; मात्र त्याला तोंड देऊन हिंदू धर्म नुसता टिकलाच नाही, तर आणखी तेजस्वी झाला. हिंदू धर्मात अनेक जाती-पाती, पंथ असले, तरी धर्म एकच आहे. आता सर्व धर्म सारखेच असे सांगितले जाते; मात्र त्यात तथ्य नाही. सनातन वैदिक धर्म हा जगात एकमेव असून, त्याला मोठे महत्त्व आहे. धर्मासाठी प्राण द्यावे लागले, तरी हरकत नाही, असे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. त्यामुळे धर्म बळकटीकरणासाठी सतत प्रयत्न व्हावेत.साध्वी अमितज्योती म्हणाल्या, हिंदू धर्माची शक्ती कमी करण्यासाठी परकीय शक्तींनी जिवापाड प्रयत्न केले; मात्र हिंदू धर्म अखंड राहिला. हिंदू संघटित राहिले, तर कोणी काही वाकडे करू शकणार नाही. रामानुजाचार्य यांनी हिंदू धर्मकार्य हे ईश्वरीय असून, वाट चुकलेल्या बांधवांना पुन्हा स्वधर्मात आणणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. धर्मजागरण सहप्रमुख राजेंद्रसिंह यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, संमेलनात उद्या (दि. १६) सकाळी ८ वाजता वनवासी बांधव पुन्हा मिरवणुकीने स्नानासाठी जाणार आहेत.

४0 हजार बांधवांची घरवापसीसंमेलनात शरद ढोले यांनी घरवापसी उपक्रमाची माहिती दिली. सन २000 पासून धर्मजागरण विभाग सुरू करण्यात आला असून, गेल्या पंधरा वर्षांत नाशिकच्या दोनशे किलोमीटर परिघातील सुमारे ४0 हजार वनवासी बांधवांची अन्य धर्मांतून हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली आहे. यांपैकी आठ हजार बांधव सदर संमेलनाला आले असून, त्यांनी तीर्थस्नान केल्याचे ढोले यांनी सांगितले.