शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

By admin | Updated: February 1, 2017 01:49 IST

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

नाशिक : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई - आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने चक्का जाम करण्यात आल्याने मोर्चाप्रमाणेच हे आंदोलन-देखील शांततेत पार पडले. तथापि, यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, देवळा, येवला, कळवण, निफाड, मनमाड, चांदवड, मालेगाव, लासलगाव व सिन्नर तालुक्यात नाशिक शहरात आडगाव मार्गावर जत्रा हॉटेल, सिन्नर फाटा, सातपूर, विल्होळी, पेठरोड तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणी आंदोलने करण्यात आली. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, युवती, महिला, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक शहरात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या तालात भजन करीत मुंबईआग्रा महामार्ग अडविला. यावेळी तरुणाईने ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वच ठिकाणी आंदोलकांनी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला  आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक चक्काजामच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना शांततापूर्ण विरोध करीत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी शीघ्रकृती दलाच्या मदतीने आंदोलकांना रस्त्यावरून हटविण्यासाठी बळाचा वापर सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडल्याने काही आंदोलकांनी समजदारीची भूमिका घेत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला.  नाशिक शहरात व्दारका चौफुली तसेच नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्याने मुंबई आग्रा महामार्गाबरोबर नाशिक पुणरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच सातपूर येथे देखील रास्ता रोको करण्यात आले. आंदोलन शांतते पार पडल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची केवळ नावांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.  (प्रतिनीधी)