शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

By admin | Updated: February 1, 2017 01:49 IST

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

नाशिक : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई - आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने चक्का जाम करण्यात आल्याने मोर्चाप्रमाणेच हे आंदोलन-देखील शांततेत पार पडले. तथापि, यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, देवळा, येवला, कळवण, निफाड, मनमाड, चांदवड, मालेगाव, लासलगाव व सिन्नर तालुक्यात नाशिक शहरात आडगाव मार्गावर जत्रा हॉटेल, सिन्नर फाटा, सातपूर, विल्होळी, पेठरोड तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणी आंदोलने करण्यात आली. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, युवती, महिला, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक शहरात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या तालात भजन करीत मुंबईआग्रा महामार्ग अडविला. यावेळी तरुणाईने ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वच ठिकाणी आंदोलकांनी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला  आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक चक्काजामच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना शांततापूर्ण विरोध करीत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी शीघ्रकृती दलाच्या मदतीने आंदोलकांना रस्त्यावरून हटविण्यासाठी बळाचा वापर सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडल्याने काही आंदोलकांनी समजदारीची भूमिका घेत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला.  नाशिक शहरात व्दारका चौफुली तसेच नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्याने मुंबई आग्रा महामार्गाबरोबर नाशिक पुणरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच सातपूर येथे देखील रास्ता रोको करण्यात आले. आंदोलन शांतते पार पडल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची केवळ नावांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.  (प्रतिनीधी)