शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

By admin | Updated: February 1, 2017 01:49 IST

नाशिक जिल्ह्यातील महामार्ग ठप्प

नाशिक : मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुंबई - आग्रा महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने चक्का जाम करण्यात आल्याने मोर्चाप्रमाणेच हे आंदोलन-देखील शांततेत पार पडले. तथापि, यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. नाशिक जिल्ह्यात सटाणा, देवळा, येवला, कळवण, निफाड, मनमाड, चांदवड, मालेगाव, लासलगाव व सिन्नर तालुक्यात नाशिक शहरात आडगाव मार्गावर जत्रा हॉटेल, सिन्नर फाटा, सातपूर, विल्होळी, पेठरोड तसेच सिडकोतील त्रिमूर्ती चौक आदि ठिकाणी आंदोलने करण्यात आली. प्रामुख्याने मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात युवक, युवती, महिला, पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. नाशिक शहरात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी टाळ-मृदंगाच्या तालात भजन करीत मुंबईआग्रा महामार्ग अडविला. यावेळी तरुणाईने ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सर्वच ठिकाणी आंदोलकांनी कोपर्डी हत्त्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, मराठा समाजाला  आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यात यावा, मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशा विविध मागण्या करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार रस्ता खुला करण्याचे आवाहन केले. परंतु आंदोलक चक्काजामच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना शांततापूर्ण विरोध करीत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पोलिसांनी शीघ्रकृती दलाच्या मदतीने आंदोलकांना रस्त्यावरून हटविण्यासाठी बळाचा वापर सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडल्याने काही आंदोलकांनी समजदारीची भूमिका घेत राष्ट्रगीताने आंदोलनाचा समारोप केला.  नाशिक शहरात व्दारका चौफुली तसेच नाशिकरोड येथील सिन्नरफाटा येथेही रास्ता रोको करण्यात आल्याने मुंबई आग्रा महामार्गाबरोबर नाशिक पुणरोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोतील त्रिमुर्ती चौक तसेच सातपूर येथे देखील रास्ता रोको करण्यात आले. आंदोलन शांतते पार पडल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची केवळ नावांची नोंद घेऊन सोडून देण्यात आले तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.  (प्रतिनीधी)