शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:36 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देखड्डे, पाण्याच्या डबक्यांमधुन काढावा लागतोय मार्गआपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक : शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.पावसामुळे दरवर्षीच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था होत असते. त्यामुळे दिवसांगणिक खड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निर्दर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरांची दुरुस्ती ही दरवर्षी करण्यात येते मात्र पुन्हा या मार्गांची दुरवस्था होऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार होत असतात त्यामुळे प्रशासनाक डून नेमक्या कशाप्रकारे दुरुस्ती करण्यात येते याबाबत नागरिकांनाकडुन प्रश्न उपस्थित होत आहे. असा कुठलाच मार्ग नाही ज्याठिकाणी खड्डे बघायला मिळत नाही. त्यात नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. याठिकाणी खड्यांचे प्रमाण दरवेळीपेक्षा अजुन वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी खड्यांसह पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही पाण्यातुनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.संपुर्ण महामार्गावरच खड्डेनाशिकरोड ते द्वारकापर्यंत संपुर्ण महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. सावरकर उड्डानपुलाच्या सुरुवातीपासुनच खड्डे बघायला मिळतात. तसेच पुढे बिटको महाविद्यालय, बिग बाजार, मुद्रणालय कॉलनी, अशोका सिग्नल, भाभा नगर सिग्नल या भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. त्यात या खड्यांमध्ये पावसाचे पाण्याचे डबके साचल्यामुळे प्रवाशांना व पादचाºयांनांही यातूनच मार्ग काढावा लागत आहे. अशात याठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे.

दररोज शहरात येतांना मार्गावर एक नवीन खड्डा तयार झालेला दिसतो, मात्र कमी होतांना दिसत नाही. त्यात नव्याने तयार झालेल्या खड्यांना चुकविण्यात काही जणांचा अपघात देखील झाला. त्यामुळे प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? त्यात या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत असते. अशात या मार्गाची कायमस्वरुपी दुरुस्थी होणे गरजेचे आहे.तुषार गाडे, प्रवासी 

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा