शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
3
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
4
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
5
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
6
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
7
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
8
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
9
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
10
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
11
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
12
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
13
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
14
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
15
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
16
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
17
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
18
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
19
BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
20
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल

उपनगर सिग्नल भागात महामार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:36 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.

ठळक मुद्देखड्डे, पाण्याच्या डबक्यांमधुन काढावा लागतोय मार्गआपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक : शहरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत असून यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गावर खड्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच याठिकाणी रस्त्यांवरच पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या खड्डे, डबक्यांमधूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना याठिकाणाहून प्रवास करतांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.पावसामुळे दरवर्षीच शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था होत असते. त्यामुळे दिवसांगणिक खड्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निर्दर्शनास येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहरांची दुरुस्ती ही दरवर्षी करण्यात येते मात्र पुन्हा या मार्गांची दुरवस्था होऊन मोठ्या प्रमाणावर खड्डे तयार होत असतात त्यामुळे प्रशासनाक डून नेमक्या कशाप्रकारे दुरुस्ती करण्यात येते याबाबत नागरिकांनाकडुन प्रश्न उपस्थित होत आहे. असा कुठलाच मार्ग नाही ज्याठिकाणी खड्डे बघायला मिळत नाही. त्यात नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर सिग्नल भागात महामार्गाची अवस्था बिकट होत चालली आहे. याठिकाणी खड्यांचे प्रमाण दरवेळीपेक्षा अजुन वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी खड्यांसह पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही पाण्यातुनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.संपुर्ण महामार्गावरच खड्डेनाशिकरोड ते द्वारकापर्यंत संपुर्ण महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहे. सावरकर उड्डानपुलाच्या सुरुवातीपासुनच खड्डे बघायला मिळतात. तसेच पुढे बिटको महाविद्यालय, बिग बाजार, मुद्रणालय कॉलनी, अशोका सिग्नल, भाभा नगर सिग्नल या भागात महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. त्यात या खड्यांमध्ये पावसाचे पाण्याचे डबके साचल्यामुळे प्रवाशांना व पादचाºयांनांही यातूनच मार्ग काढावा लागत आहे. अशात याठिकाणी किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे.

दररोज शहरात येतांना मार्गावर एक नवीन खड्डा तयार झालेला दिसतो, मात्र कमी होतांना दिसत नाही. त्यात नव्याने तयार झालेल्या खड्यांना चुकविण्यात काही जणांचा अपघात देखील झाला. त्यामुळे प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? त्यात या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत असते. अशात या मार्गाची कायमस्वरुपी दुरुस्थी होणे गरजेचे आहे.तुषार गाडे, प्रवासी 

 

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा