शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:12 IST

शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.

ठळक मुद्देरस्ते अपघातात पंचवटी अग्रेसर : तारवालानगर चौफुली बनली धोकादायक

पंचवटी : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.औरंगाबादरोड, जुना आडगावनाका, निमाणी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी होत असली तरी त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातावर नियंत्रण कसे मिळविणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर चौफुलीवर होणाºया अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या चुकीमुळे अपघात घडले आहेत. अपघातावर नियंत्रण यावे म्हणून स्वयंचलित सिग्नल पाठोपाठ गतिरोधक बसविण्यात आले, परंतु त्याचाही फारसा उपयोग झालेला नसून, महिन्याभरात डझनपेक्षा जास्त अपघात तारवालानगर चौफुलीवर घडले आहेत.या चौफुलीवर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर असेपर्यंत चालक वाहतूक नियम पालन करतात, त्यानंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’. मुंबई- आग्रा महामार्गावर गेल्या वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिसरोडने वळविण्यात आली आहे, त्यात वेगाने जाण्याच्या प्रयत्नात चारचाकी एकमेकांना धडकून अपघात घडत असून, या रस्त्यावर अलीकडे दिवसाला एक अपघाती मृत्यू असे समीकरण तयार झाले आहे. अशीच परिस्थिती नाशिक-औरंगाबादरोडवर असून, या रस्त्यावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. त्यामुळे लग्नसराईत औरंगाबादनाका उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी होते. आडगाव नाका, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, निमाणी, हिरावाडी या चारही मुख्य रस्त्याला उपरस्ते येऊन मिळत असल्याने दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.सिग्नल यंत्रणा कुचकामीमुख्य वाहतूक चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक वाहतूक रस्त्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली असली तरी, ‘अतिघाई संकटात नेई’ याप्रमाणे चालक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने नेतात आणि त्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे चौफुलींवर कायम वाहतूक पोलीस नेमले पाहिजे, तर चौफुली सुरू होण्यापूर्वी किमान शंभर मीटर अंतरावर पुढे अपघात स्थळ आहे किंवा धोकादायक चौफुली असल्याने वाहने हळू चालवा, असे फलक लावणे गरजेचे आहे. पंचवटी परिसरातील मखमलाबादनाका, काट्या मारुती चौक, औरंगाबाद नाका, तारवालानगर, सेवाकुंज, पेठरोड बाजार समिती चौक भागात प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील अनेक सिग्नल बंद आहेत, तर अनेक सिग्नलवर वाहतूक पोलीस नसतात त्यामुळे सिग्नल नावपुरतेच असल्याचे बोलले जाते.स्पीड हम्पद्वारे नियंत्रणतारवालानगर चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी गतिरोधक बसविले होते, मात्र गतिरोधकामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने सकाळी बसविलेले गतिरोधक काही तासांत काढून टाकण्यात आले होते. आता काही दिवसांपूर्वी पालिकेने स्पीड हम्प टाकले असले तरी या स्पीड हम्पवर अर्धवट पांढरे पट्टे मारलेले असल्याने ते वाहनधारकांना व्यवस्थित दिसत नाही त्यातच या स्पीड हम्पमुळे आणखी अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा