शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:12 IST

शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.

ठळक मुद्देरस्ते अपघातात पंचवटी अग्रेसर : तारवालानगर चौफुली बनली धोकादायक

पंचवटी : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर होणारे अपघात पाहता पंचवटी रस्ते अपघातात अग्रेसर राहिला आहे.औरंगाबादरोड, जुना आडगावनाका, निमाणी बसस्थानकासमोर वाहतूक कोंडी होत असली तरी त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने अपघातावर नियंत्रण कसे मिळविणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील तारवालानगर चौफुलीवर होणाºया अपघातावर नियंत्रण बसावे यासाठी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या चुकीमुळे अपघात घडले आहेत. अपघातावर नियंत्रण यावे म्हणून स्वयंचलित सिग्नल पाठोपाठ गतिरोधक बसविण्यात आले, परंतु त्याचाही फारसा उपयोग झालेला नसून, महिन्याभरात डझनपेक्षा जास्त अपघात तारवालानगर चौफुलीवर घडले आहेत.या चौफुलीवर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी हजर असेपर्यंत चालक वाहतूक नियम पालन करतात, त्यानंतर मात्र पुन्हा ‘जैसे थे’. मुंबई- आग्रा महामार्गावर गेल्या वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक सर्व्हिसरोडने वळविण्यात आली आहे, त्यात वेगाने जाण्याच्या प्रयत्नात चारचाकी एकमेकांना धडकून अपघात घडत असून, या रस्त्यावर अलीकडे दिवसाला एक अपघाती मृत्यू असे समीकरण तयार झाले आहे. अशीच परिस्थिती नाशिक-औरंगाबादरोडवर असून, या रस्त्यावर मंगल कार्यालये व लॉन्स आहेत. त्यामुळे लग्नसराईत औरंगाबादनाका उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी होते. आडगाव नाका, काट्या मारुती चौक, गणेशवाडी, निमाणी, हिरावाडी या चारही मुख्य रस्त्याला उपरस्ते येऊन मिळत असल्याने दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.सिग्नल यंत्रणा कुचकामीमुख्य वाहतूक चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक वाहतूक रस्त्यावर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली असली तरी, ‘अतिघाई संकटात नेई’ याप्रमाणे चालक वेगाने जाण्याच्या प्रयत्नात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने नेतात आणि त्यामुळे अपघात घडतात. त्यामुळे चौफुलींवर कायम वाहतूक पोलीस नेमले पाहिजे, तर चौफुली सुरू होण्यापूर्वी किमान शंभर मीटर अंतरावर पुढे अपघात स्थळ आहे किंवा धोकादायक चौफुली असल्याने वाहने हळू चालवा, असे फलक लावणे गरजेचे आहे. पंचवटी परिसरातील मखमलाबादनाका, काट्या मारुती चौक, औरंगाबाद नाका, तारवालानगर, सेवाकुंज, पेठरोड बाजार समिती चौक भागात प्रशासनाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील अनेक सिग्नल बंद आहेत, तर अनेक सिग्नलवर वाहतूक पोलीस नसतात त्यामुळे सिग्नल नावपुरतेच असल्याचे बोलले जाते.स्पीड हम्पद्वारे नियंत्रणतारवालानगर चौफुलीवर वारंवार होणाºया अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी गतिरोधक बसविले होते, मात्र गतिरोधकामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने सकाळी बसविलेले गतिरोधक काही तासांत काढून टाकण्यात आले होते. आता काही दिवसांपूर्वी पालिकेने स्पीड हम्प टाकले असले तरी या स्पीड हम्पवर अर्धवट पांढरे पट्टे मारलेले असल्याने ते वाहनधारकांना व्यवस्थित दिसत नाही त्यातच या स्पीड हम्पमुळे आणखी अपघाताची शक्यता असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा