शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक उच्चांकी २७७९ बाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सोमवारी नवीन उच्चांक स्थापित करत तब्बल २७७९ पर्यंत मजल मारली. सोमवारी (दि. २२) दिवसभरात बाधित संख्येने पुन्हा अडीच हजाराचा टप्पा ओलांडला असून त्यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १,५४४ रुग्णांचा समावेश आहे. त्यात तब्बल पाच महिन्यांनंतर बळींची संख्यादेखील दिवसभरात १२ वर गेल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी तब्बल २,७७९ बाधित रुग्ण तर २,६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ३, ग्रामीणला ९ असे एकूण १२ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २,२३२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने २ हजार आणि अडीच हजारावर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे तब्बल २,५०८ बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा बाधित संख्येने त्यापेक्षाही खूप मोठा टप्पा गाठल्याने जिल्ह्याची वाटचाल कुठल्या दिशेने सुरू आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे.

इन्फाे

नाशिक मनपा क्षेत्रात १,५४४

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा सर्वाधिक १,५४४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरात सलग पाचव्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रसार सर्वाधिक वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. मनपा क्षेत्रात आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असताना आणि नागरिक जागरूक असतानाही कोरोनाबाधितांच्या वेगाने मनपाचा आरोग्य विभागदेखील चक्रावून गेला आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल ४,०४६

जिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात प्रचंड वेगाने वाढ होत आहे. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून सोमवारी ही प्रलंबित अहवाल संख्या ४,०४६ वर पोहोचली आहे. बाधितांच्या आकड्यातील सातत्यपूर्ण वाढ आणि अहवाल मिळण्यास मर्यादा असल्याने प्रलंबित संख्या सातत्याने ४ हजारांवरच राहिली आहे.

इन्फो

बळीतील वाढीने चिंता

कोरोना रुग्ण वाढीइतकीच किंबहुना त्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे कोरोना बळींची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकडी राहिली आहे. यापूर्वी कोरोनाबळी दहावर राहण्याचे प्रमाण कोरोनाच्या बहराच्या काळात म्हणजे सप्टेंबरमध्येच होते. रविवारी १० तर सोमवारी १२ बळी गेल्याने ही बळींची वाढती संख्या हा अधिक चिंतेचा विषय ठरत आहे.