शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

‘त्या’ साखळीतील छुप्या घटकांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:29 IST

ईडीच्या कार्यालयाकडून सहा वर्षांनंतर या प्रकरणात पुन्हा फास आवळला गेल्याने बहुचर्चित धान्य घोटाळ्याची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. या ...

ईडीच्या कार्यालयाकडून सहा वर्षांनंतर या प्रकरणात पुन्हा फास आवळला गेल्याने बहुचर्चित धान्य घोटाळ्याची नव्याने चर्चा होऊ लागली आहे. या धान्य घोटाळ्यातील वाहतूक ठेकेदारांवर कारवाई झाल्याने अन्य पडद्यामागील घटकदेखील हादरले आहेत. ‘ईडी’च्या जाळ्यात आता यापुढे या प्रकरणात आणखी कोण कोण अडकतात याकडे आता लक्ष लागून आहे. तिघा घोरपडे बंधूंची नागपूर येथील कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती तिघांनी कोट्यवधींचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर ‘मनी लॉन्ड्रिंग’चा ठपका ठेवण्यात आला. तिघांनी सकारात्मक उत्तरे चौकशीदरम्यान दिली नसल्याने ईडीच्या तपासी पथकाने त्यांना अटक केली.

सक्तवसुली संचालनालयाच्या नागपूर कार्यालयाकडून रेशन धान्य घोटाळ्यात घोरपडे बंधूंना अटक करण्यात आली आहे. यामुळे सहा वर्षांपूर्वी थेट विधानसभेत गाजलेला नाशिकचा रेशन धान्य काळ्याबाजाराचा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यात वाहतूक ठेकेदार संशयित संपत नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे आणि विश्वास नामदेव घोरपडे यांच्यावर गुन्ह्याची व्याप्ती राज्यासह परराज्यातसुद्धा पोहचल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईदेखील केली होती. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये यांची पाच कोटींची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर फरार घोरपडे बंधू पोलिसांना शरण आले होते. सहा महिने मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगल्यानंतर २०१८साली त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.