शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

हरणबारी ८९; केळझर ५७ टक्के भरले

By admin | Updated: August 2, 2016 00:50 IST

हरणबारी ८९; केळझर ५७ टक्के भरले

सटाणा : बागलाण तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. प्रकल्पाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या साल्हेर परिसरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. सोमवारी हरणबारी ८९ टक्के, तर केळझर ५७ टक्के भरले आहे. दसाणा, पठावा हे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती व कान्हेरी नदीला पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणा, पठावा, जाखोड, दोधेश्वर, शेमळी, रातीर हे लघुप्रकल्प तालुक्याची तहान भागवितात. गेल्या वर्षी आॅगस्ट अखेरपर्यंत तालुक्याचा जलसाठा अवघा बारा टक्के होता. यंदा मात्र पावसाने जुलैमध्ये जरी हजेरी लावली असली तरी ती समाधानकारक आहे. या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असून, ११७२ दसलक्षघनफूट क्षमता असलेल्या हरणबारी धरणात १०४० दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे. ५७२ दशलक्षघनफूट क्षमतेच्या केळझर धरणात ३२३ दशलक्षघनफूट इतका पाणीसाठा झाला आहे तर हत्ती व कान्हेरी नदीवरील दसाणा, पठावा हे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नद्यांना पाणी आले असून, नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जाखोड, दोधेश्वर या लघुप्रकल्पाच्या साठ्यातही वाढ होऊन प्रकल्प ७६ टक्के भरले आहेत. मात्र शेमळी, रातीर, सुराणे येथील प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. हा परिसर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असून, पाऊस न झाल्यास पाण्याची भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.