शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नैसर्गिक आपत्तीतील मृतांच्या नातेवाईकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू ओढावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू ओढावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात नैसर्गिक आपत्ती ओढावल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पुरात वाहून गेलेल्यांना तसेच वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात देण्यात आला.

चालू वर्षात नैसर्गिक आपत्तीत ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. त्यानुसार सहाजणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर तिघांचा पुरात वाहून तर एकाचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. त्यापैकी सात दावे पात्र ठरले असून, मृताच्या नातेवाईकांना शासनाच्या नियमाप्रमाणे जीवितासाठी देण्यात येणारी प्रत्येकी चार लाखांची मदत देण्यात आली. या प्रकरणांत वर्षभरात एकूण २८ लाखांची मदत देण्यात आली आहे.

मागीलवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तींमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये अनेकांची आर्थिक व जीवितहानी झाली आहे. वादळी वारा तसेच मुसळधार पाऊस आणि वीज पडून होणाऱ्या दुर्घटनेत काहींना आपले प्राण गमवावे लागले. चालू वर्षात विध्वंसक असा पाऊस झाला नसला, तरी मध्यंतरी नैसर्गिक आपत्तीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहाजणांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. त्यापैकी येवला व सिन्नर तालुक्यात दोन तर निफाड व इगतपुरी तालुक्यातील एका घटनेचा समावेश आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीनजण पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मालेगाव व देवळ्यात अंगावर भिंत कोसळून दोघांना जीव गमवावा लागला. शासकीय आदेशानुसार, पुरात वाहून अथवा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवार अथवा नातेवाईकांना प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत दिली जाते. या ११ घटनांपैकी सात प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून, प्रत्येकी चार लाख याप्रमाणे २८ लाखांची मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सातपैकी सहा प्रकरणे वीज कोसळून मृत्यू झालेल्यांची असून, एक प्रकरण पुरात वाहून गेलेल्याचे आहे.