शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

खासगी वाहतूकदारांची महामंडळाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:12 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये व काही प्रमाणात गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग व एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) दुपारी घेतला. यानुसार शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे नागरिकांचे हाल होऊ नये व काही प्रमाणात गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने प्रादेशिक परिवहन विभाग व एसटी महामंडळाने शासनाच्या आदेशानुसार खासगी वाहतूकदारांची मदत घेण्याचा निर्णय मंगळवारी (दि. १७) दुपारी घेतला. यानुसार शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली.दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे महामंडळाच्या कारभारासह सरकारच्या भूमिकेविरुद्धही तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांची गैरसोय काही प्रमाणात कमी होण्यासाठी खासगी वाहतूकदारांची मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पुढाकार घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधून प्रवासी वाहतूक करण्यास सांगितले. दरम्यान, चौधरी यांनी एसटीच्या दरपत्रकापेक्षा निम्म्या दरात नागरिकांना सणासुदीच्या काळात वाहतूक सेवा पुरविण्याची तयारी दर्शवित ठक्कर बाजार येथून बससेवा दुपारी सुरू केली. पुणे, औरंगाबाद, धुळे, सटाणा, नंदुरबार, जळगाव आदी शहरांसाठी ठक्कर बाजार येथून खासगी बससेवा उपलब्ध आहे. मंगळवारी त्र्यंबकेश्वरसाठी पाच बसेसद्वारे मोफत सेवा देण्यात आली.खासगी वाहतुकीबाबत शासनाची अधिसूचनागृहमंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवासी वाहतुकीसाठी मोटार वाहन अधिनियमानुसार शासनाने राज्यातील सर्व खासगी संस्थांच्या मालकीच्या बसेसला प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल-कॉलेजच्या बसेस, विविध कंपन्यांच्या बसेस व मालवाहू वाहनांनाही प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे अधिसूचनेत शासनाच्या कार्यासन अधिकारी नि. ज्यो. घिरटकर यांनी म्हटले आहे.संप नागरिकांसाठी अडचणींचा असतो. सनदशीर मार्गाने संप करणे हा कामगारांचा हक्क आहे; मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी दराच्या निम्म्यापेक्षाही कमी दरात आमची कंपनी प्रवाशांना सेवा देण्यासाठी पुढे आली. यामागे नफेखोरीचा उद्देश नसून केवळ माणुसकी म्हणून आम्ही बससेवा उपलब्ध करून दिली आहे. संपकाळात बससेवा पुरविली जाणार असून, रात्रीदेखील बसेस ठक्कर बाजार येथून उपलब्ध असणार आहेत. कसारापर्यंत ५० रुपये प्रतिप्रवासीनुसार बससेवा असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरीसाठी मोफत सेवा पुरविली जाईल.- ब्रिजमोहन चौधरी, संचालक