शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

जेसीबीच्या साहाय्याने डोंगळे उद््ध्वस्त

By admin | Updated: April 22, 2017 00:30 IST

नाशिक : पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली आहे.

 नाशिक : पालखेड धरणातून येवला व मनमाडसाठी आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने आजपासून डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात पाटबंधारे खात्याला यश आले आहे. येवला शहर, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना, प्रासंगिक गावे, मनमाड शहर व मनमाड रेल्वे आदिंसाठी पालखेड धरणातून येत्या २५ मे पासून ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, नदी व कालव्याच्या माध्यमातून विसर्ग केल्या जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत. कालव्यात शेतकऱ्यांनी यापूर्वीच डोंगळे टाकून ठेवले आहेत. गेल्या वर्षी याच डोंगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी झाल्याने पाटबंधारे खाते तसेच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. सुमारे साडेसात हजारांहून अधिक डोंगळे काढण्याची मोहीम हाती घेण्याबरोबरच कालव्याच्या पाण्यावर सशस्त्र पोलीस पहारा तैनात करावा लागला होता. गत अनुभव लक्षात घेता यंदा पाणी सोडण्यापूर्वीच डोंगळे काढण्यात येत असून, शुक्रवारी पिंपळगाव ते विंचूर दरम्यान मोहीम राबविण्यात येऊन जवळपास शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. येत्या तीन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. पालखेड धरणातून सोडण्यात येणारे पाणी पाटोदा साठवण तलाव तसेच येवला शहरात साठवण्यात येणार असून, चालू हंगामातील हे अखेरचे आवर्तन असून, सदरचे पाणी १५ जूनपर्यंत वापरणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)