शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

जेसीबीच्या साहाय्याने डोंगळे उद््ध्वस्त

By admin | Updated: April 22, 2017 00:30 IST

नाशिक : पालखेड धरणातून आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली आहे.

 नाशिक : पालखेड धरणातून येवला व मनमाडसाठी आवर्तन सोडण्याच्या तयारीचा भाग म्हणून पाटबंधारे खात्याने आजपासून डाव्या कालव्यातील डोंगळे काढण्यास सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात पाटबंधारे खात्याला यश आले आहे. येवला शहर, येवला तालुक्यातील ३८ गावे पाणीपुरवठा योजना, प्रासंगिक गावे, मनमाड शहर व मनमाड रेल्वे आदिंसाठी पालखेड धरणातून येत्या २५ मे पासून ७५० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असून, नदी व कालव्याच्या माध्यमातून विसर्ग केल्या जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत. कालव्यात शेतकऱ्यांनी यापूर्वीच डोंगळे टाकून ठेवले आहेत. गेल्या वर्षी याच डोंगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी झाल्याने पाटबंधारे खाते तसेच जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली होती. सुमारे साडेसात हजारांहून अधिक डोंगळे काढण्याची मोहीम हाती घेण्याबरोबरच कालव्याच्या पाण्यावर सशस्त्र पोलीस पहारा तैनात करावा लागला होता. गत अनुभव लक्षात घेता यंदा पाणी सोडण्यापूर्वीच डोंगळे काढण्यात येत असून, शुक्रवारी पिंपळगाव ते विंचूर दरम्यान मोहीम राबविण्यात येऊन जवळपास शंभराहून अधिक डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. येत्या तीन दिवस ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. पालखेड धरणातून सोडण्यात येणारे पाणी पाटोदा साठवण तलाव तसेच येवला शहरात साठवण्यात येणार असून, चालू हंगामातील हे अखेरचे आवर्तन असून, सदरचे पाणी १५ जूनपर्यंत वापरणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)