शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उत्पन्नासह वारस दाखले यापुढे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:17 IST

राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसलेले रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रकारचे बारा ते तेरा दाखले येत्या दोन आॅक्टोबरपासून देणे बंद करण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे.

नाशिक : राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसलेले रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रकारचे बारा ते तेरा दाखले येत्या दोन आॅक्टोबरपासून देणे बंद करण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे.यासंदर्भात राज्य तलाठी महासंघाची परभणी येथे नुकतीच बैठक घेण्यात आली असता त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचे निवेदन महसूल विभागाचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले आहे. शासकीय कामात अडथळे येऊ नये, लोकांची कामे दाखल्याविना थांबू नये या हेतूने गावोगावचे तलाठी व मंडळ अधिकारी लोकांच्या आणि विविध विभागांच्या मागणीनुसार दाखले देतात.त्यातून लोकांच्या गरजा भागत होत्या मात्र तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसतानाही दाखले दिल्याने तलाठी व मंडळ अधिकाºयांना काही प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांना यासंदर्भात न्यायालयाकडूनही विचारणा झाल्यामुळे संबंधिताना मनस्ताप होऊ लागला आहे. राज्य तलाठी संघाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली व त्यावर जे दाखले देण्याचा अधिकारच नाही ते दाखले देण्याचे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तलाठी महासंघाने महसूल विभागाच्या सचिवांना निवेदन देऊन त्याबाबत मार्गदर्शनही मागविले आहे.