शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी

By admin | Updated: July 31, 2016 01:13 IST

अशोक चव्हाण : कांदा प्रश्न, शिर्डी संस्थान नियुक्तीवर टीका

 नाशिक : गेल्या दोन आठवड्यांपासून बंद असलेल्या कांदा लिलावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कांदा उत्पादकांना सरकारने नुकसानभरपाई दिली पाहिजे. भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही बहुमताच्या जोरावर विधानसभेत कामकाज रेटून नेले जात आहे. सरकारला जनतेशी काहीही घेणे-देणे राहिलेले नाही. जनतेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या विरोधी पक्षांची मुस्कटदाबी लोकसभेत आणि विधानसभेत भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना बाजार समितीच्या नियमन मुक्तीचा निर्णय घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत आवाज उठवूनही त्यावर सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. कांदा लिलाव न झाल्याने कांदा उत्पादकांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई दिली पाहिजे. तसेच तत्काळ कांदा लिलाव सुरू केले पाहिजेत. सर्वसामान्यांना महाग असलेली तूरडाळ मात्र महागड्या मॉलमध्ये स्वस्त करण्याकडे सरकारचा कल आहे. पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये कधीच कांदा प्रश्न काय किंवा अन्य सर्वसामान्यांच्या प्रश्नावर कधीही चर्चा नसते, असेही चव्हाण म्हणाले. भ्रष्ट मंत्र्यांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री बघू, करू, अशी भाषा वापरत आहे. बहुमताच्या जोरावर कामकाज रेटून नेण्याचा त्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकला आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी बैठका घेत आहे. यापूर्वी नागपूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे येथेही अशाच प्रकारे कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्राथमिक चर्चा करून संवाद साधत आहे. आगामी निवडणुकांमध्ये तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. कॉँग्रेसमध्ये मरगळ आलेली नाही, उलट आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीशी युती नको, असे सांगितले आहे. असेच संमिश्र वातावरण अन्य जिल्ह्णात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी आघाडीचा प्रदेश पातळीवरून नव्हे तर जिल्हा पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देणार आहोत. यावेळी माजीमंत्री रोहिदास पाटील, प्रभारी उल्हास पाटील, डी. जी. पाटील, के. सी. पाडवी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जयप्रकाश छाजेड, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, प्रसाद हिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)