शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

येवला तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 22, 2017 00:02 IST

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. गेली तीन वर्षे भीषण दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे या भागातील राजापूर, ममदापूर, सोमठाण जोश, देवदरी, खरवंडी, रहाडी या गावांना जानेवारी महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु या वर्षी पर्जन्यवृष्टी चांगली राहिल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ममदापूरचे सरपंच व ग्रामसेवक यांनी आठ दिवसांपूर्वी माहिती लेखी स्वरूपात देऊनदेखील कुठल्याही प्रकारची दखल ग्रामपंचायत सरपंच घेत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. ममदापूर सरपंचदेखील महिला असल्याने त्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. राजापूर, ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही पिण्याच्या पाण्यासाठी मार्च महिन्यातच टंचाई निर्माण झाली असून, या परिसरात एकही मोठा बंधारा किंवा धरण नाही त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनदेखील पावसाचे पाणी वाहून जाते तेव्हा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला प्रत्येक वेळी सामोरे जावे लागत आहे. या परिसरात कुठल्याही पाटाचे किंवा पाटचारीचे पाणी येत नाही त्यामुळे या भागात लवकरात लवकर पिण्याच्या पाण्यासाठी वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातून होते आहे. (वार्ताहर)