शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

By admin | Updated: September 19, 2015 23:08 IST

दमदार पावसाने घटले ३६ टॅँकर

नाशिक : शुक्रवारी दिवसभर बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई झपाट्याने कमी होत असून, एकाच दिवसाच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील ३६ पाणी टॅँकर तत्काळ बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारनंतर पुन्हा पुनर्पाहणी करून टॅँकर बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले.जिल्ह्यात प्रामुख्याने दुष्काळी आणि टंचाईग्रस्त समजल्या जाणाऱ्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागातील गावांवरील पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या निम्म्यावर आली आहे. सिन्नर तालुक्यात शंभरहून गाव-वाड्यांना २९ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. शुक्रवारच्या दमदार पावसानंतर २९ पैकी १४ खासगी पाणीपुरवठा करणारे टॅँकर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ १५ टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येवल्यातही यावर्षी पाणीटंचाईची परिस्थिती बिकट होती. मात्र शुक्रवारच्या दमदार पावसामुळे तिही कमी झाली आहे. येवल्यात २० टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात १६ टॅँकरने पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला असून, चार टॅँकरने तूर्तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही सोमवारी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत पुनर्पाहणी करून हे टॅँकरही बंद करायचे की सुरू ठेवायचे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. नांदगावला नऊ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यातील एक टॅँकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. चांदवड तालुक्यात सात टँकरने टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यात पाच टॅँकर बंद करण्यात येऊन दोन टॅँकरच आता पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू ठेवले आहे. अन्य तालुक्यांतूनही पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरची संख्या घटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)