शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुसळधार पावसामुळे भात शेतीला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:04 IST

सर्वर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या टाकेद परिसरात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भात निंदणीला वेग आला आहे.

ठळक मुद्देदमदार हजेरी : टाकेद परिसरात भात निंदणीला वेग

सर्वर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या टाकेद परिसरात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भात निंदणीला वेग आला आहे.

पूर्व भागातील अधरवड,पिंपळगावमोर,धामणी,खेड, परदेशवाडी,वासाळी,बारशिंगवे,सोनोशी,मायदरा, धानोशी ,अडसरे या परिसरातील भातशेतीलाशेती पूरक पाऊस पडल्याने या परिसरातील शेतकरी राजा भात निंदणी करण्यात व शेतीला शेवटच्या टप्प्यातील खते मारण्यात व्यस्त झाला आहे. चालू वर्षी जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर तब्बल जून जुलै या दोन महिन्यांत पावसाने पाठ फिरवली होती परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. कोरडा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी दुबार भाताची पेरणी केली व सिंचनाच्या ,विहिरीच्या,कुपनलिकेच्या पाण्यावर भाताची रोपे जगवली होती.त्यानंतर आॅगस्ट मध्ये वरूनराजाने एकाकी दमदार सुरुवात केल्यानंतर या परिसरातील शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला व आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत या परिसरात भाताची आवणी, लागवड अंतिम टप्प्यात आली त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक शेतकºयांना भात शेतीला पूरक पाऊस नसल्याने भात वाढीसाठी रासायनिक खतांचा मारा करता येत नव्हता परंतु गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात दमदार मुसळधार पाऊस पडल्याने या परिसरातील बहुतांश शेतकरी वर्ग हा भात शेतीला वाढीसाठी ही रासायनिक खते देण्यात मग्न झाला आहे. तर अनेक शेतकरी मजूर भात निंदणी करण्यात व्यस्त झाला आहे. तसेच अनेक शेतकºयांच्या इंद्रायणी,गरे,हाळे,रुपम,ओम श्रीराम, सोनाली,आर चोवीस,एक हजार आठ आदी भाताच्या प्रजातींवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची व शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी भात उत्पादक शेतक?्यांकडून प्रकर्षाने करण्यात येत आहे.अनेक शेतकºयांच्या भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे करप्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी भात पिकांवर रोगप्रतिबंधक औषधफवारणी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी