शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

शहरात धुव्वाधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पूर्वेचे वारे यांचा मिलाफ हा राज्याच्या किनारपट्टीवर झाल्यामुळे ढगनिर्मितीला अनुकूल असे वातावरण तयार झाले ...

उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि पूर्वेचे वारे यांचा मिलाफ हा राज्याच्या किनारपट्टीवर झाल्यामुळे ढगनिर्मितीला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. किनारपट्टीवर उंच ढग दाटले असून, या भागात विजांचा गडगडाटासह वादळी स्वरूपाचा पाऊस होत आहे, तसेच अन्य भागांमध्ये काही वेळ अचानकपणे दमदार पाऊस होऊ लागला आहे. हवामान बदलामुळे यंदा चक्क जानेवारीत पावसाचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.

शनिवारी दिवसभर नागरिकांना उष्माही जाणवला. कारण कमाल तापमानाचा पारा २९.३ अंशापर्यंत वर सरकला, तर किमान तापमान सकाळी २० अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली, तसेच वातावरणात सकाळी आर्द्रतेचे प्रमाण ९३ टक्के इतके होते.

पंचवटी, मेरी, म्हसरुळ या भागासह शहराच्या मध्यवर्ती परिसरात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सात वाजेनंतर

--इन्फो---

‘लानिना’चा हवामानावर प्रभाव

सध्या हवामानाची स्थिती ‘लानिना ’ स्वरूपाची बनली आहे. यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञ सुनील काळभोर यांनी सांगितले. प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण हाेऊन पाण्याचे तापमानात घट होऊन अशी स्थिती तयार होते, असे त्यांनी सांगितले. सध्या हवामानावर ‘लानिना’चा होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. दुपारनंतर शहरात अशा प्रकारे अचानकपणे दमदार सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काळभोर म्हणाले.

--इन्फो--

नाशिकचे द्राक्षे संकटात

मध्य, उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा सामना पुढील तीन दिवस करावा लागू शकतो. या बेमोसमी पावसाचा मोठा फटका द्राक्षबागांना बसत आहे. द्राक्षांच्या घडांमधील मणी फुटत असल्याने द्राक्षबागायतदार धास्तावला आहे. एकूण नोव्हेंबरअखेरपासून हवामानाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे यंदा नाशिकची द्राक्षे मोठ्या संकटात सापडली आहेत. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गव्हासारख्या पिकांच्या वाढीवरही दुष्परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.

--

फोटो क्र : ०९पीएचजेएन १२२/१२३