शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

८० कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:22 IST

नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे ८३ गावठी कोंबड्यांचा मृत्यू झालावातावरणातील उष्णतेमुळे सर्वच उपाय फिके

नायगाव : वाढत्या उष्णतेमुळे माणसांबरोबर पशु-पक्ष्यांच्या जिवाचीही काहिली होत असून, सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे अतिउष्णतेमुळे ऐंशी गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाच्या झळांनी अक्षरश: अंग भाजून निघत आहे. अशा वातावरणामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अतिउष्णतेमुळे पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. तालुक्यातील जायगाव येथील रमेश पोपट हुल्लारे यांच्या ३०, सुरेश आनंदा गायकवाड यांच्या २५, तर इंदूबाई मोहन लहाने यांच्या २८ कोंबड्या अशा एकूण ८३ गावठी कोंबड्यांचा मृत्यू झाला.दिवसागणिक वाढत्या उष्णतेच्या झळांनी सकाळपासूनच अंगातून घामांच्या धारा सुरू होण्यास घालमेल सुरुवात होते अशा जिवाची होणाऱ्या वातावरणात पशुपक्ष्यांच्या जिवाची काहिली होत आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी अंग भाजून निघत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या मेहनतीने जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देत असले तरी वातावरणातील उष्णतेमुळे सर्वच उपाय फिके पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. नायगाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेळ्या, मेंढ्या व गायीवासरांची शिकार पाठोपाठ उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐंशी ते नव्वद कोंबड्या दगावल्याने सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.