शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

आठ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:24 IST

नाशिक : जिल्ह्यात कुष्ठरोग तसेच क्षयरोग असलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांना ...

नाशिक : जिल्ह्यात कुष्ठरोग तसेच क्षयरोग असलेले रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांना भेटी देणार आहेत. या मोहिमेस डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण महिना ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान, काही ठराविक तालुके तसेच वाड्या, पाड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील रुग्ण शोधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, सहायक संचालक कुष्ठरोग विभाग डॉ. रवींद्र चौधरी, सहा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तुरावली देशमुख व सर्व तालुका आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य व शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांचे मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सदरची मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी कुष्ठरोगी आणि क्षयरोगी शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोहिम राबविली जाते. कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांना लवकरात लवकर ओळखून उपचाराखाली आणणे गरजेचे असल्याने या मोहिमेत अशा रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात ४३ लक्ष ४६ हजार १३५ एवढी लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात ३७ लक्ष १० हजार, ३७५, तर शहरी भाग अर्थात नगरपालिका असलेल्या ठिकाणी ६ लक्ष ३५ जार ७९० एवढी लोकसंख्या आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८ लक्ष ६९ हजार २२७ कुटुंबांना भेट दिली जाणार आहे यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३८२० टीम तयार करण्यात आल्या आहेत. रुग्ण शोधमोहिमेत कर्मचारी प्रत्येक घरी भेट देऊन घरातील व्यक्तींची तपासणी करणार आहेत. यामध्ये संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांना योग्य पद्धतीने तपासणी करून उपचार देण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सदरची मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी या मोहिमेसाठी येणाऱ्या आरोग्यसेवक-आरोग्यसेविका यांना नागरिकांनी सहकार्य करून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्यप्रकारे व खरी माहिती द्यावी व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आवाहन केले आहे.