शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

प्रत्येक कुटुंबाचे ‘आरोग्य सर्वेक्षण’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:11 IST

गावच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच याप्रमाणे गावनिहाय सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. पाच दिवसात ...

गावच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच याप्रमाणे गावनिहाय सर्वेक्षण पथके तयार करण्यात आली आहेत. पाच दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे यांनी संबंधित पथकांना दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचे लवकर निदान झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार करता येतील. रुग्णाचे प्राण वाचवता येतील, तसेच त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्ग टाळता येईल या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम या उपक्रमात हाती घेण्यात आले आहे. अनेक रुग्ण दवाखान्यात भरती होत असतानाच त्यांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा खाली आलेली असते. एचआरसीटी स्कोरही वाढलेला असतो. कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण जास्त असून त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमीचे झाले आहे. त्यामुळे तातडीने तालुकास्तरावर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार प्रत्येक पथकातील कर्मचारी दररोज ५० कुटुंबांचे सर्वेक्षण करतील.

इन्फो

संशयितांची करणार आरटीपीसीआर

सर्वेक्षणादरम्यान घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान, ऑक्सिजन पातळी, पल्स रेट यांच्या नोंदी घेतील. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या तसेच अधिक तापमान असलेल्या, कोरोनाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची, सारी रोगाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांची स्वतंत्र माहिती तयार करून ही माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल. या संशयित रुग्णांची आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली जाईल. त्याच किंवा दुसऱ्या दिवशी सदर रुग्णांची कोविड टेस्ट करण्याची जबाबदारी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याची राहील.

इन्फो

ग्रामपंचायत पुरवणार साहित्य

सर्वेक्षण पथकास पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, बॅटरी सेल आणि सर्वेक्षणाची माहिती भरण्यासाठी रजिस्टर आदी साहित्य ग्रामनिधीतून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर टाकण्यात आली आहे. संबंधितांना साहित्य मिळाले किंवा नाही याची माहिती घेण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. आवश्यक साहित्य मिळाले नाही किंवा नादुरुस्त झाले म्हणून सर्वेक्षण करता आले नाही, अशी बाब कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधित ग्रामसेवकास त्यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे.