शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:03 IST

मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्टÑातील बहुतांश भागात चालू वर्षी मोठा दुष्काळ निर्माण झाला आहे. या अगोदरही सतत चार-पाच वषे दुष्काळाच्याच छायेत गेली. मात्र यंदाचा दुष्काळ ग्रामीण जनतेला चांगलाच जाणवत आहे. जंगलातही झाडपाला उरलेला नाही. यामुळे जनावरांसह माणसांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.अन्नधान्याचे उत्पादन नगदी पिकाच्या तुलनेत घटले आहे. पावसाचेही प्रभाव घटल्याने हातावर काम करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक अडचणीसह पोटाची खळगी भरण्याचेही दुरापास्त होत चालले आहे. पावसाचे प्रमाण घटल्याने अशीच स्थिती राहिली तर दुष्काळाची स्थिती भयावह होणार आहे. यामुळे ग्रामीण जनतेला मानसिक आधार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी खचणार आहे. शेतकऱ्यांवरील संकटे कमी होत नाही तर वाढतच आहेत. यामुळे पोट भरण्यासाठी विविध तर्कविर्तक लढविले जात आहे.ऐन दुष्काळात रोजगार हमीची कामे बंद झाल्याने आर्थिक आवक बंद झाली आहे. रोजगार हमी योजनेची किती कामे झाली यासाठी अधिकारी निरुत्तर आहेत. त्यातच पोटाची भूक भागविण्यासाठी गहू, बाजरी या अन्नधान्याचे उत्पादन घटल्याने स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळच भूक भागवत आहेत. त्यातही चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी रोजगार बुडवून पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. सायंकाळी दररोज खिचडीचा आहार यामुळे नुसती खळगी भरण्यापलीकडे स्वस्त धान्याचा खुराक आरोग्याला पोषण भेटण्याऐवजी आरोग्य अशक्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागात फक्त दिवसामागून दिवस लोटणे असे म्हटले तर वावगे ठरू नये.स्वस्त धान्य दुकाने आज ग्रामीण जनतेची भूक भागवत असले तरी त्यातून फक्त खळगीच भरत आहे. पोषण मिळण्यासाठी स्वत:च्या शेतातील गहू, बाजरी, अन्नधान्य पुरेसे ठरणार आहे.- ज्ञानेश्वर पवार, शेतकरी, दसाणे