शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 00:03 IST

मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्टÑातील बहुतांश भागात चालू वर्षी मोठा दुष्काळ निर्माण झाला आहे. या अगोदरही सतत चार-पाच वषे दुष्काळाच्याच छायेत गेली. मात्र यंदाचा दुष्काळ ग्रामीण जनतेला चांगलाच जाणवत आहे. जंगलातही झाडपाला उरलेला नाही. यामुळे जनावरांसह माणसांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.अन्नधान्याचे उत्पादन नगदी पिकाच्या तुलनेत घटले आहे. पावसाचेही प्रभाव घटल्याने हातावर काम करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक अडचणीसह पोटाची खळगी भरण्याचेही दुरापास्त होत चालले आहे. पावसाचे प्रमाण घटल्याने अशीच स्थिती राहिली तर दुष्काळाची स्थिती भयावह होणार आहे. यामुळे ग्रामीण जनतेला मानसिक आधार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी खचणार आहे. शेतकऱ्यांवरील संकटे कमी होत नाही तर वाढतच आहेत. यामुळे पोट भरण्यासाठी विविध तर्कविर्तक लढविले जात आहे.ऐन दुष्काळात रोजगार हमीची कामे बंद झाल्याने आर्थिक आवक बंद झाली आहे. रोजगार हमी योजनेची किती कामे झाली यासाठी अधिकारी निरुत्तर आहेत. त्यातच पोटाची भूक भागविण्यासाठी गहू, बाजरी या अन्नधान्याचे उत्पादन घटल्याने स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळच भूक भागवत आहेत. त्यातही चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी रोजगार बुडवून पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. सायंकाळी दररोज खिचडीचा आहार यामुळे नुसती खळगी भरण्यापलीकडे स्वस्त धान्याचा खुराक आरोग्याला पोषण भेटण्याऐवजी आरोग्य अशक्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागात फक्त दिवसामागून दिवस लोटणे असे म्हटले तर वावगे ठरू नये.स्वस्त धान्य दुकाने आज ग्रामीण जनतेची भूक भागवत असले तरी त्यातून फक्त खळगीच भरत आहे. पोषण मिळण्यासाठी स्वत:च्या शेतातील गहू, बाजरी, अन्नधान्य पुरेसे ठरणार आहे.- ज्ञानेश्वर पवार, शेतकरी, दसाणे