शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 31, 2014 22:41 IST

उघड्यावरील उष्टावळ रोगराईला देते निमंत्रण

मालेगाव : शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, खानावळ व चहाटपरी येथे अत्यंत गलिच्छ वातावरण राहत असून, तेथील उष्टावळी व केरकचरा शहरभर विविध ठिकाणी उघड्यावर पडत असल्याने शहरात रोगराई पसरत आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच संबंधित हॉटेल्स - खानावळ व चहाटपऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगाव शहर - परिसरातून रोज जवळपास आठ ते दहा लक्ष लोकसंख्येचे वास्तव्य व ये - जा सुरू असते. शहरात यंत्रमाग व्यवसायावर काम करणारे कारागीर मोठ्या संख्येने असून, त्यांच्यासाठी असलेल्या खानावळी, चहाटपरी व छोट्यामोठ्या हॉटेल्स यांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील बाजारपेठा, बसस्थानक प्रमुख चौक येथेही शाकाहारीसोबत मांसाहारी हॉटेल्सची संख्या वाढलेली आहे. याशिवाय शहरातील मध्यमवर्गीय व उच्चवर्णीय जनतेसाठीही शहर परिसरात काही हॉटेल्स निर्माण झाली आहेत. यापैकी शहराच्या दाटवस्तीत जी छोटी-मोठी हॉटेल्स-खानावळी व चहाटपरी आहेत, तेथील वातावरण अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे आहे. काही हॉटेल्स, खानावळी व चहाटपऱ्या या रस्त्याच्या कडेला, खुल्या गटारनाल्यावर, त्यालगत आहेत. त्यामुळे येथे दिवसरात्र माशा, डास व विविध कीटकांचा मुक्त संचार असतो. याशिवाय या हॉटेल्स - खानावळमधील विविध प्रकारची उष्टावळी व केरकचरा हा रात्री उशिरा वा भल्या सकाळी हॉटेल्सच्या परिसरातच वा मुख्यरस्त्यालगत उघड्यावर टाकला जातो. मनपा प्रशासनातर्फे मुळात शहरातील गटार नाल्यांची साफसफाई ठीक होत नाही. गटारीतून काढलेला कचरा बरेच दिवस उचलला जात नाही. त्यात या हॉटेल्स - खानावळ व चहाटपरींमधील उष्टावळी व केरकचऱ्याने अधिक भर पडते. या कचऱ्यात प्लास्टीक पिशवी, ग्लास, भांडे आदिंचा समावेश असतो.याचा दुष्परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसन व पचनसंस्थेचे आजार जडले आहे. मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. शहरात डेंग्यू, मलेरियासह विविध साथीच्या आजाराचे रुग्ण वर्षभर असतात. अशा अस्वच्छ परिसरामुळे त्यांना आरोग्यदायी वातावरणापासून दूर रहावे लागते. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरात यासंबंधी व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने यासंबंधी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.