शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य : खानावळी, चहाटपऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: October 31, 2014 22:41 IST

उघड्यावरील उष्टावळ रोगराईला देते निमंत्रण

मालेगाव : शहर व परिसरातील विविध हॉटेल्स, खानावळ व चहाटपरी येथे अत्यंत गलिच्छ वातावरण राहत असून, तेथील उष्टावळी व केरकचरा शहरभर विविध ठिकाणी उघड्यावर पडत असल्याने शहरात रोगराई पसरत आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाने शहरात व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच संबंधित हॉटेल्स - खानावळ व चहाटपऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मालेगाव शहर - परिसरातून रोज जवळपास आठ ते दहा लक्ष लोकसंख्येचे वास्तव्य व ये - जा सुरू असते. शहरात यंत्रमाग व्यवसायावर काम करणारे कारागीर मोठ्या संख्येने असून, त्यांच्यासाठी असलेल्या खानावळी, चहाटपरी व छोट्यामोठ्या हॉटेल्स यांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील बाजारपेठा, बसस्थानक प्रमुख चौक येथेही शाकाहारीसोबत मांसाहारी हॉटेल्सची संख्या वाढलेली आहे. याशिवाय शहरातील मध्यमवर्गीय व उच्चवर्णीय जनतेसाठीही शहर परिसरात काही हॉटेल्स निर्माण झाली आहेत. यापैकी शहराच्या दाटवस्तीत जी छोटी-मोठी हॉटेल्स-खानावळी व चहाटपरी आहेत, तेथील वातावरण अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे आहे. काही हॉटेल्स, खानावळी व चहाटपऱ्या या रस्त्याच्या कडेला, खुल्या गटारनाल्यावर, त्यालगत आहेत. त्यामुळे येथे दिवसरात्र माशा, डास व विविध कीटकांचा मुक्त संचार असतो. याशिवाय या हॉटेल्स - खानावळमधील विविध प्रकारची उष्टावळी व केरकचरा हा रात्री उशिरा वा भल्या सकाळी हॉटेल्सच्या परिसरातच वा मुख्यरस्त्यालगत उघड्यावर टाकला जातो. मनपा प्रशासनातर्फे मुळात शहरातील गटार नाल्यांची साफसफाई ठीक होत नाही. गटारीतून काढलेला कचरा बरेच दिवस उचलला जात नाही. त्यात या हॉटेल्स - खानावळ व चहाटपरींमधील उष्टावळी व केरकचऱ्याने अधिक भर पडते. या कचऱ्यात प्लास्टीक पिशवी, ग्लास, भांडे आदिंचा समावेश असतो.याचा दुष्परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे अनेकांना श्वसन व पचनसंस्थेचे आजार जडले आहे. मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष झालेले आहे. शहरात डेंग्यू, मलेरियासह विविध साथीच्या आजाराचे रुग्ण वर्षभर असतात. अशा अस्वच्छ परिसरामुळे त्यांना आरोग्यदायी वातावरणापासून दूर रहावे लागते. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरात यासंबंधी व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने यासंबंधी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.