शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

बरे झाले ‘कर्ण’ टोचले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST

मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, ...

मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, राजकारण्यांच्या केवळ बोलण्यात असलेली पोटतिडीक, सरकारी बाबूंमधील अनास्था या सर्व बाबींवर परखड तरीही साहित्यिकीय सौम्य शब्दांत भाष्य केले. ओरिसा आणि मणिपूरसारख्या राज्यांची भवने मुंबईत, नवी मुंबईत आहेत. पण मराठी भवन नाही. इतकं स्पष्टपणे सांगतानाच राज्यातील २४ संस्थांनी मिळून मुंबईत मागील सरकारच्या काळात आंदोलन केल्यावर कुठे सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची हा निर्णय झाल्याचे कर्णिक यांनी सांगितले. मात्र, हे सांगतानाच कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारख्या महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्थेनेदेखील मराठी भाषेसाठी शासन दरबारी शब्दाचे वजन वापरावे. तसेच प्रतिष्ठानने प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय होऊन योगदान देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगत प्रतिष्ठानलादेखील मराठीच्या भल्यासाठी आता मैदानात उतरण्याचे आवाहन केले. ज्या शासनात माहिती अधिकारी म्हणून काम केले, ज्या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम केले, त्यांचे कान टोचावेसे कर्णिकांना वाटले असेल तर त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून खरोखरच गांभिर्याने विचार करण्याची आणि कार्यप्रवण होऊन मराठी भाषेला पुनर्वैभवाप्रती नेण्याची वेळ निश्चितच आली आहे.

इन्फो !

अशी घुसखोरी रोखा

मराठी भाषेतील ‘ज्ञानपीठ’ असे जनस्थान पुरस्काराला मानले जाते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या महान साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणारा आणि प्रदान करणारे हातदेखील तितकेच महान असतात, अशी या पुरस्काराची परंपरा आहे. मात्र, शनिवारी झालेल्या सोहळ्यात नुकत्याच झालेल्या एका विश्वस्ताने जनस्थान सन्मानाची ट्रॉफी अध्यक्षांच्या हाती सुपुर्द केल्यानंतर व्यासपीठावरून मागे हटणे अपेक्षित असताना त्या विश्वस्ताने अध्यक्षांबरोबर जणू आपणच ‘जनस्थान’ प्रदान करीत असल्याचा अविर्भाव दाखवला. स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले यांच्यासारखे दिग्गज स्टेजवर असतानाही त्यांनी पुरस्कार प्रदान करताना बाजूला केवळ उभे राहण्याची परंपरा कायम राखली. मात्र, हे नूतन विश्वस्त पार पुरस्कार प्रदान करूनच बाजूला झाले. ती ट्रॉफी जड असली तरी दोन मान्यवरांना ती सहज हातात धरता येऊ शकते, हे भान ठेवून संबंधिताने मागे फिरायला हवे होते. पण तसे न करता संधीचा फायदा घेत पुरस्कार प्रदानात झालेला घुसखोरीचा प्रयत्न निदान भविष्यात तरी पुन्हा घडू न देण्याची दक्षता बाळगायला हवी.