शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बरे झाले ‘कर्ण’ टोचले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:19 IST

मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, ...

मात्र, शनिवारी झालेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मराठीची शासन दरबारी असलेली अवस्था, राजकारण्यांच्या केवळ बोलण्यात असलेली पोटतिडीक, सरकारी बाबूंमधील अनास्था या सर्व बाबींवर परखड तरीही साहित्यिकीय सौम्य शब्दांत भाष्य केले. ओरिसा आणि मणिपूरसारख्या राज्यांची भवने मुंबईत, नवी मुंबईत आहेत. पण मराठी भवन नाही. इतकं स्पष्टपणे सांगतानाच राज्यातील २४ संस्थांनी मिळून मुंबईत मागील सरकारच्या काळात आंदोलन केल्यावर कुठे सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची हा निर्णय झाल्याचे कर्णिक यांनी सांगितले. मात्र, हे सांगतानाच कुसुमाग्रज प्रतिष्ठानसारख्या महाराष्ट्रातील सर्वोच्च संस्थेनेदेखील मराठी भाषेसाठी शासन दरबारी शब्दाचे वजन वापरावे. तसेच प्रतिष्ठानने प्रत्यक्ष चळवळीत सक्रिय होऊन योगदान देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगत प्रतिष्ठानलादेखील मराठीच्या भल्यासाठी आता मैदानात उतरण्याचे आवाहन केले. ज्या शासनात माहिती अधिकारी म्हणून काम केले, ज्या संस्थेत अध्यक्ष म्हणून काम केले, त्यांचे कान टोचावेसे कर्णिकांना वाटले असेल तर त्याबाबत वरिष्ठ स्तरावरून खरोखरच गांभिर्याने विचार करण्याची आणि कार्यप्रवण होऊन मराठी भाषेला पुनर्वैभवाप्रती नेण्याची वेळ निश्चितच आली आहे.

इन्फो !

अशी घुसखोरी रोखा

मराठी भाषेतील ‘ज्ञानपीठ’ असे जनस्थान पुरस्काराला मानले जाते. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या महान साहित्यिकांना ज्ञानपीठ मिळाल्याचा इतिहास आहे. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारणारा आणि प्रदान करणारे हातदेखील तितकेच महान असतात, अशी या पुरस्काराची परंपरा आहे. मात्र, शनिवारी झालेल्या सोहळ्यात नुकत्याच झालेल्या एका विश्वस्ताने जनस्थान सन्मानाची ट्रॉफी अध्यक्षांच्या हाती सुपुर्द केल्यानंतर व्यासपीठावरून मागे हटणे अपेक्षित असताना त्या विश्वस्ताने अध्यक्षांबरोबर जणू आपणच ‘जनस्थान’ प्रदान करीत असल्याचा अविर्भाव दाखवला. स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले यांच्यासारखे दिग्गज स्टेजवर असतानाही त्यांनी पुरस्कार प्रदान करताना बाजूला केवळ उभे राहण्याची परंपरा कायम राखली. मात्र, हे नूतन विश्वस्त पार पुरस्कार प्रदान करूनच बाजूला झाले. ती ट्रॉफी जड असली तरी दोन मान्यवरांना ती सहज हातात धरता येऊ शकते, हे भान ठेवून संबंधिताने मागे फिरायला हवे होते. पण तसे न करता संधीचा फायदा घेत पुरस्कार प्रदानात झालेला घुसखोरीचा प्रयत्न निदान भविष्यात तरी पुन्हा घडू न देण्याची दक्षता बाळगायला हवी.