शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ भाजीमंडईतच थाटला संसार

By admin | Updated: August 7, 2016 22:36 IST

पुराचा फटका : बेघरांनी शोधला निवारा

पंचवटी : गेल्या मंगळवारी गोदावरीला आलेल्या पुरामुळे झोपडपट्टीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा पूर आल्याने अनेक बेघरांनी गणेशवाडीतील भाजीमंडईचा आधार घेत तेथेच चूल मांडल्याने मनपाची भाजीमंडई सध्या बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे. मंगळवारी आलेल्या पुरामुळे गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाऱ्या अनेकांच्या झोपड्या, पाल वाहून गेले. पावसाचा मारा सुरूच असल्याने या शेकडो बेघरांना लपंडावचा खेळ खेळावा लागला. पूर आल्याने काहीकाळ मनपाच्या भाजीमंडईचा आधार घेतला खरा, पण दुपारी पुराच्या पाण्याने भाजीमंडईला कवेत घेतल्याने बेघरांची पळापळ झाली. गुरुवारी पाऊस उघडल्याने व पुराचे पाणी ओसल्यानंतर या बेघरांनी पुन्हा नदीकाठी झोपड्या, पाल टाकले मात्र शनिवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसामुळे त्यांची दाणाफाण उडाली. रात्रीतून जायचे कोठे म्हणून पुन्हा या बेघर कुटुंबांनी लहान मुले, भांडी, कपड्यांची गाठोडी उचलून मनपाच्या भाजीमंडईचा रस्ता गाठला. सध्या या बेघरांनी भाजीमंडईलाच घर मानून तेथेच चूल पेटवित दाटीवाटीने संसार मांडला आहे. महापालिकेने भाजीविक्रे त्यांसाठी बनविलेल्या सर्वच ओट्यांवर या बेघरांनी सहारा घेतला असल्याचे चित्र सध्या भाजीमंडईत दिसून येत आहे. पुरामुळे भाजीमंडईत संपूर्ण गाळ व चिखल साचल्याने तेथे उघड्यावर संसार मांडलेल्या शेकडो बेघरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.