शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:02 IST

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.

ठळक मुद्देबागलाण : डोंगरेज गावाची भागली तहान ; सुमन खैरनार यांचे औदार्य

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील  सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.येथूनच जवळ असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या डोंगरेज या गावात सद्यस्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा उद्भव या दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे कोरडा झाला असून गावपरिसरातील सर्वच विहिरींनीही माना टाकल्या आहेत. यामुळे गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी अक्षरश: रानोमाळ भटकत आहेत.याच पार्श्वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकतीच गावाला भेट देऊन पाणीसमस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यात विहीर अधिग्रहणासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली. मात्र यात समाधानकारक मार्ग निघत नसल्याने सरपंच सुमन खैरनार यांनीच स्वमालकीच्या विहिरीचे पाणी गावाला उपलब्ध करून सामाजिक दायित्व निभवावे अशी विनंती तहसीलदारांनी केली. या विनंतीला सरपंच खैरनार यांनी तात्काळ संमती देत शेतीचे पाणी बंद करून गावाला पाणी उपलब्ध करून दिले आहे.शेतात दोन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला पिकाला तिलांजली देण्याचा निर्णय त्यांनी यासाठी घेतला आहे. अर्धा किलोमीटर पाईपलाईन द्वारे हे पाणी गावाच्या विहिरीत टाकले जात असून गावातील सर्व भागाला समान व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमनबाई जातीने लक्षही देतांना दिसून येत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे गावाची पाणीसमस्या दूर झाली असून टँकरमुळे गावावर होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे. तसेच परिसरातील अन्य गावातील राजकारणी व जनता यांनाही यामाध्यमातून एक चांगला संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.गावाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. सरपंच म्हणून हीच जबाबदारी स्वीकारत शेतातील पिकाला दुर्लक्षित करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे गावाची तहान भागली असून एक चांगले सामाजिक कार्य केल्याचा आनंदही यातून पदरी पडला आहे.सुमन खैरनार (सरपंच, डोंगरेज)(फोटो १० सुमन खैरनार)