शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 18:02 IST

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.

ठळक मुद्देबागलाण : डोंगरेज गावाची भागली तहान ; सुमन खैरनार यांचे औदार्य

विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील  सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.येथूनच जवळ असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या डोंगरेज या गावात सद्यस्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा उद्भव या दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे कोरडा झाला असून गावपरिसरातील सर्वच विहिरींनीही माना टाकल्या आहेत. यामुळे गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी अक्षरश: रानोमाळ भटकत आहेत.याच पार्श्वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकतीच गावाला भेट देऊन पाणीसमस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यात विहीर अधिग्रहणासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली. मात्र यात समाधानकारक मार्ग निघत नसल्याने सरपंच सुमन खैरनार यांनीच स्वमालकीच्या विहिरीचे पाणी गावाला उपलब्ध करून सामाजिक दायित्व निभवावे अशी विनंती तहसीलदारांनी केली. या विनंतीला सरपंच खैरनार यांनी तात्काळ संमती देत शेतीचे पाणी बंद करून गावाला पाणी उपलब्ध करून दिले आहे.शेतात दोन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला पिकाला तिलांजली देण्याचा निर्णय त्यांनी यासाठी घेतला आहे. अर्धा किलोमीटर पाईपलाईन द्वारे हे पाणी गावाच्या विहिरीत टाकले जात असून गावातील सर्व भागाला समान व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमनबाई जातीने लक्षही देतांना दिसून येत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे गावाची पाणीसमस्या दूर झाली असून टँकरमुळे गावावर होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे. तसेच परिसरातील अन्य गावातील राजकारणी व जनता यांनाही यामाध्यमातून एक चांगला संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.गावाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. सरपंच म्हणून हीच जबाबदारी स्वीकारत शेतातील पिकाला दुर्लक्षित करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे गावाची तहान भागली असून एक चांगले सामाजिक कार्य केल्याचा आनंदही यातून पदरी पडला आहे.सुमन खैरनार (सरपंच, डोंगरेज)(फोटो १० सुमन खैरनार)