शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना लसीकरणानंतरची घाई ठरते घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते ...

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते किंवा नाही, हे तपासणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने काही व्यक्ती अनावधानाने तर काही व्यक्ती काहीच होत नाही, अशा अतिरेकी आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच केंद्राबाहेर पडतात. त्यानंतर काही अंतर जाण्यापूर्वीच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, घाबरल्यासारखे होते. रस्त्यावर अशावेळी कोणतीही घटना घडू शकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी किमान अर्धा तास लसीकरण केंद्राबाहेर पडू नये, हे निर्बंध कायम असून नागरिकांनी स्वत:च ते पाळणे आवश्यक असल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.

देशात कोरोनाबाबतच्या लसीकरणाला वेग देण्यात आला असून, हळूहळू राज्याला लस मिळण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रांवर पुन्हा नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार लसीनंतर प्रत्येक नागरिकाने केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे. तसेच लस घेतल्यानंतर दिवसभरात एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. पण, अशावेळी घाबरून न जाता नागरिकांनी काय करावे, हेदेखील जाहीर करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, १० टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लसीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावे लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या केंद्रातच ही पर्यायी व्यवस्था तसेच स्वतंत्र डॉक्टर्स उपलब्ध असतात.

शासकीय प्रोटोकॉलनुसार तिथे आवश्यक ते उपचार केले जातात.

इन्फो

समितीच्या शिफारशी बंधनकारक

एईएफआय (अ‍ॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायझेशन) असे या समितीचे नाव असून, कोरोना लसीकरणाशी संबंधित देशात झालेल्या मृत्यूच्या प्रारंभीच्या काही घटनांनंतर या समितीने तिचे निकष आणि निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. त्यामुळेच लस घेतल्यानंतर काही दुष्पपरिणाम होत आहेत का, हे तपासण्यासाठीच तिथे अर्धा तास थांबणे आवश्यक असते, असे या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

इन्फो

लस हेच औषध

जिल्ह्यात दोन्ही लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकाचा लसीकरणामुळे मृत्यू झालेला नाही. काहींना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच औषधोपचार करून ते बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लस हेच औषध असल्याचे सिद्ध झाले आहे.

--------------

ही डमी आहे.