शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणानंतरची घाई ठरते घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते ...

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते किंवा नाही, हे तपासणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने काही व्यक्ती अनावधानाने तर काही व्यक्ती काहीच होत नाही, अशा अतिरेकी आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच केंद्राबाहेर पडतात. त्यानंतर काही अंतर जाण्यापूर्वीच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, घाबरल्यासारखे होते. रस्त्यावर अशावेळी कोणतीही घटना घडू शकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी किमान अर्धा तास लसीकरण केंद्राबाहेर पडू नये, हे निर्बंध कायम असून नागरिकांनी स्वत:च ते पाळणे आवश्यक असल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.

देशात कोरोनाबाबतच्या लसीकरणाला वेग देण्यात आला असून, हळूहळू राज्याला लस मिळण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रांवर पुन्हा नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार लसीनंतर प्रत्येक नागरिकाने केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे. तसेच लस घेतल्यानंतर दिवसभरात एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. पण, अशावेळी घाबरून न जाता नागरिकांनी काय करावे, हेदेखील जाहीर करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, १० टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लसीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावे लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या केंद्रातच ही पर्यायी व्यवस्था तसेच स्वतंत्र डॉक्टर्स उपलब्ध असतात.

शासकीय प्रोटोकॉलनुसार तिथे आवश्यक ते उपचार केले जातात.

इन्फो

समितीच्या शिफारशी बंधनकारक

एईएफआय (अ‍ॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायझेशन) असे या समितीचे नाव असून, कोरोना लसीकरणाशी संबंधित देशात झालेल्या मृत्यूच्या प्रारंभीच्या काही घटनांनंतर या समितीने तिचे निकष आणि निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. त्यामुळेच लस घेतल्यानंतर काही दुष्पपरिणाम होत आहेत का, हे तपासण्यासाठीच तिथे अर्धा तास थांबणे आवश्यक असते, असे या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

इन्फो

लस हेच औषध

जिल्ह्यात दोन्ही लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकाचा लसीकरणामुळे मृत्यू झालेला नाही. काहींना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच औषधोपचार करून ते बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लस हेच औषध असल्याचे सिद्ध झाले आहे.

--------------

ही डमी आहे.