शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
6
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
7
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
8
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
9
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
10
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
11
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
12
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
13
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
14
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
15
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
16
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
18
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
20
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

कोरोना लसीकरणानंतरची घाई ठरते घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते ...

नाशिक : कोरोनाची कोणतीही लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास प्रत्येक नागरिकाने त्या केंद्रात थांबणे बंधनकारक आहे. मात्र, व्यक्ती थांबते किंवा नाही, हे तपासणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने काही व्यक्ती अनावधानाने तर काही व्यक्ती काहीच होत नाही, अशा अतिरेकी आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच केंद्राबाहेर पडतात. त्यानंतर काही अंतर जाण्यापूर्वीच त्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, घाबरल्यासारखे होते. रस्त्यावर अशावेळी कोणतीही घटना घडू शकण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी किमान अर्धा तास लसीकरण केंद्राबाहेर पडू नये, हे निर्बंध कायम असून नागरिकांनी स्वत:च ते पाळणे आवश्यक असल्याचे अनेक प्रसंगांतून दिसून आले आहे.

देशात कोरोनाबाबतच्या लसीकरणाला वेग देण्यात आला असून, हळूहळू राज्याला लस मिळण्याच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे केंद्रांवर पुन्हा नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी दिसू लागली आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या दिशानिर्देशांनुसार लसीनंतर प्रत्येक नागरिकाने केंद्रावर किमान अर्धा तास थांबणे बंधनकारक आहे. तसेच लस घेतल्यानंतर दिवसभरात एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. पण, अशावेळी घाबरून न जाता नागरिकांनी काय करावे, हेदेखील जाहीर करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार, १० टक्के लोकांना असा त्रास जाणवू शकतो. लसीचा डोस घेतल्यानंतर पहिला अर्धा तास सेंटरवरच राहावे लागेल. लसीकरणानंतर कोणत्याही पद्धतीच्या साईड इफेक्टवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या केंद्रातच ही पर्यायी व्यवस्था तसेच स्वतंत्र डॉक्टर्स उपलब्ध असतात.

शासकीय प्रोटोकॉलनुसार तिथे आवश्यक ते उपचार केले जातात.

इन्फो

समितीच्या शिफारशी बंधनकारक

एईएफआय (अ‍ॅडव्हर्स इव्हेंट्स फॉलोविंग इम्युनायझेशन) असे या समितीचे नाव असून, कोरोना लसीकरणाशी संबंधित देशात झालेल्या मृत्यूच्या प्रारंभीच्या काही घटनांनंतर या समितीने तिचे निकष आणि निर्बंध अधिक कठाेर केले आहेत. त्यामुळेच लस घेतल्यानंतर काही दुष्पपरिणाम होत आहेत का, हे तपासण्यासाठीच तिथे अर्धा तास थांबणे आवश्यक असते, असे या समितीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

इन्फो

लस हेच औषध

जिल्ह्यात दोन्ही लस घेतलेल्या कोणत्याही नागरिकाचा लसीकरणामुळे मृत्यू झालेला नाही. काहींना लसीकरणानंतर कोरोनाची बाधा झाली असली तरी त्यांना रुग्णालयात दाखल न करता घरीच औषधोपचार करून ते बरे झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लस हेच औषध असल्याचे सिद्ध झाले आहे.

--------------

ही डमी आहे.