शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:01 IST

गोरख घुसळे । पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा ...

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका : रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती

गोरख घुसळे ।पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे. सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे.पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी, कातरणी, पिंपरी, धुळगाव, साबरवाडी, खैरगव्हाण, सावरगाव, सोमठाण देश, निलखेडे, आंबेगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके व दव पहावयास मिळाले. आज दुपारपर्यंत धुक्यामुळे जवळील काही अंतरावरदेखील दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे.ढगाळ वातावरणामुळे पिके खराब झाल्याने उत्पादनात घटयावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली. शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकºयांनी खरीप हंगामाची लागवड केली.४गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.पाटोदा आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड धुके पडत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात धुके व दव पडले आहे. या धुके व दवामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागेवर डावणी तसेच कांद्यावर करपा रोगाचे प्रमाण वाढले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्यात जमा आहे.- नंदकुमार मेंगाणे, शेतकरी, पाटोदाधुके, दवामुळे कांदा सडला४सध्या बाजारात कांद्यास चांगला भाव मिळत आहे. व अजूनही काही दिवस कांद्यास असेच बाजारभाव मिळण्याची शेतकºयांना खात्री आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सकाळी पडणाºया या दव व धुक्यामुळे कांदा व कांदारोपांच्या पातीवर दव साचत असून, या दवाचा निचरा होऊन कांद्याच्या बुडाला पोहचत असल्याने कांदा हा जमिनीतच सडत आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील कांदा यामुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती