शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:01 IST

गोरख घुसळे । पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा ...

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका : रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती

गोरख घुसळे ।पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे. सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे.पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी, कातरणी, पिंपरी, धुळगाव, साबरवाडी, खैरगव्हाण, सावरगाव, सोमठाण देश, निलखेडे, आंबेगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके व दव पहावयास मिळाले. आज दुपारपर्यंत धुक्यामुळे जवळील काही अंतरावरदेखील दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे.ढगाळ वातावरणामुळे पिके खराब झाल्याने उत्पादनात घटयावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली. शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकºयांनी खरीप हंगामाची लागवड केली.४गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.पाटोदा आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड धुके पडत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात धुके व दव पडले आहे. या धुके व दवामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागेवर डावणी तसेच कांद्यावर करपा रोगाचे प्रमाण वाढले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्यात जमा आहे.- नंदकुमार मेंगाणे, शेतकरी, पाटोदाधुके, दवामुळे कांदा सडला४सध्या बाजारात कांद्यास चांगला भाव मिळत आहे. व अजूनही काही दिवस कांद्यास असेच बाजारभाव मिळण्याची शेतकºयांना खात्री आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सकाळी पडणाºया या दव व धुक्यामुळे कांदा व कांदारोपांच्या पातीवर दव साचत असून, या दवाचा निचरा होऊन कांद्याच्या बुडाला पोहचत असल्याने कांदा हा जमिनीतच सडत आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील कांदा यामुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती