शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पिकांवरील दवामुळे बळीराजा धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:01 IST

गोरख घुसळे । पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा ...

ठळक मुद्देगोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका : रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती

गोरख घुसळे ।पाटोदा : गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी हतबल झालेला असतानाच परिसरात हवामानाने आपला लहरीपणा नवीन वर्षातही कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दाट धुके व दव पडत असून, हे धुके दुपारपर्यंत कायम दिसत होते. या दव व धुक्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व कांदा रोपांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच तयार द्राक्षबागांवर डावणीचे प्रमाण वाढल्यामुळे कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, पूर्णत: हतबल झाले आहे. सकाळी पडणाऱ्या या नयनरम्य धुक्यामुळे पिकांची वाट लागली असून, उत्पादनात घट येण्याची धास्ती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात आला असून, त्याची चिंता वाढली आहे.पाटोदा परिसरातील ठाणगाव, कानडी, विखरणी, कातरणी, पिंपरी, धुळगाव, साबरवाडी, खैरगव्हाण, सावरगाव, सोमठाण देश, निलखेडे, आंबेगाव, शिरसगाव लौकी, वळदगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके व दव पहावयास मिळाले. आज दुपारपर्यंत धुक्यामुळे जवळील काही अंतरावरदेखील दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारत आहेत, त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, मात्र आता तो पूर्णपणे हतबल झाला असून, पिकांवर किती वेळा महागड्या औषधांची फवारणी करायची, असा सवाल करत आहे.ढगाळ वातावरणामुळे पिके खराब झाल्याने उत्पादनात घटयावर्षी अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन, कांदा ही सर्व पिके पावसामुळे सडून गेल्याने खराब झाली. शेतकऱ्यांच्या हाती दमडीही आली नाही. खरिपासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला, असे असतानाही शेतकºयांनी खरीप हंगामाची लागवड केली.४गेल्या दोन महिन्यापासून असलेले ढगाळ हवामान, पाऊस, दाट धुके व दवामुळे रब्बी हंगामातील, कांदा व कांदारोप, हरभरा व भाजीपाला पिके खराब झाल्याने उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.पाटोदा आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड धुके पडत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षाच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात धुके व दव पडले आहे. या धुके व दवामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष व डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. द्राक्षबागेवर डावणी तसेच कांद्यावर करपा रोगाचे प्रमाण वाढले आहे. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्यात जमा आहे.- नंदकुमार मेंगाणे, शेतकरी, पाटोदाधुके, दवामुळे कांदा सडला४सध्या बाजारात कांद्यास चांगला भाव मिळत आहे. व अजूनही काही दिवस कांद्यास असेच बाजारभाव मिळण्याची शेतकºयांना खात्री आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सकाळी पडणाºया या दव व धुक्यामुळे कांदा व कांदारोपांच्या पातीवर दव साचत असून, या दवाचा निचरा होऊन कांद्याच्या बुडाला पोहचत असल्याने कांदा हा जमिनीतच सडत आहे. परिसरातील हजारो हेक्टरवरील कांदा यामुळे खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती