शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
3
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
4
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
5
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
6
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
7
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
8
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
9
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
10
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
11
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
12
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
13
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
14
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
15
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
16
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
17
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
18
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
19
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
20
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:19 IST

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसायखेडा : मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने दुभार पेरणीचे संकट

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.यंदा निफाड तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पावसाचा थेंब देखील पडला नाही. जून महिन्यात सगळी नक्षत्र कोरडी ठाक गेली. जुलै महिन्यात तुरळक पाऊस पडला जमिनीत पाणी काही प्रमाणात जिरल्याने ओलावा तयार झाला. त्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भुईमुग या पिकांची लागवड केली. तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, काकडी, मिरची, वेलवर्गीय पिके यांची लागवड केली.मोठ्या प्रमाणावर खर्च करून पिके शेतात उभी केली, मात्र पिके उभी राहत नाही तोच पावसाने ओढ दिली. अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याचा थेंब देखील पडला नाही. विहिरी उन्हाळ्यात कोरड्याठाक पडल्या आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी सलग दोन वर्षपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. जेमतेम हाती आलेली पिके कवडीमोल भावात विकावी लागली होती, कांदा, द्राक्ष सोयाबीन या पिकांचा खर्च देखील वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. यंदाची पिके शेतात उभी करण्यासाठी उसनवारी करीत बियाणे, खते खरेदी केली आहे. मोठया प्रमाणावर आलेला खर्च पावसाच्या लहरीपणामुळे वाया जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.शेतात लागवड केलेल्या पिकांचा पंचनामा करावा, जमिनीतुन न उगवणाºया बियाणांचा खर्च सरकारने देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.चौकट...दुकानदारांची उसनवारी करून बियाणे खरेदी केली आहे. पावसाचा जोर कायम राहील म्हणून काळ्या मातीत बियाणे फेकून मोठी जुगार शेतकरी खेळला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके उगवत नाही. उगवलेले पिके करपून गेल्याने दुभार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- कांतीलाल खालकर, शेतकरी.