शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:19 IST

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसायखेडा : मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने दुभार पेरणीचे संकट

सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.यंदा निफाड तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पावसाचा थेंब देखील पडला नाही. जून महिन्यात सगळी नक्षत्र कोरडी ठाक गेली. जुलै महिन्यात तुरळक पाऊस पडला जमिनीत पाणी काही प्रमाणात जिरल्याने ओलावा तयार झाला. त्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भुईमुग या पिकांची लागवड केली. तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, काकडी, मिरची, वेलवर्गीय पिके यांची लागवड केली.मोठ्या प्रमाणावर खर्च करून पिके शेतात उभी केली, मात्र पिके उभी राहत नाही तोच पावसाने ओढ दिली. अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याचा थेंब देखील पडला नाही. विहिरी उन्हाळ्यात कोरड्याठाक पडल्या आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी सलग दोन वर्षपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. जेमतेम हाती आलेली पिके कवडीमोल भावात विकावी लागली होती, कांदा, द्राक्ष सोयाबीन या पिकांचा खर्च देखील वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. यंदाची पिके शेतात उभी करण्यासाठी उसनवारी करीत बियाणे, खते खरेदी केली आहे. मोठया प्रमाणावर आलेला खर्च पावसाच्या लहरीपणामुळे वाया जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.शेतात लागवड केलेल्या पिकांचा पंचनामा करावा, जमिनीतुन न उगवणाºया बियाणांचा खर्च सरकारने देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.चौकट...दुकानदारांची उसनवारी करून बियाणे खरेदी केली आहे. पावसाचा जोर कायम राहील म्हणून काळ्या मातीत बियाणे फेकून मोठी जुगार शेतकरी खेळला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके उगवत नाही. उगवलेले पिके करपून गेल्याने दुभार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- कांतीलाल खालकर, शेतकरी.