शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

अद्याप पाऊस न बरसल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:58 IST

न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला वर्गांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देन्यायडोंगरी : महिला वर्गांना पाण्यासाठी करावी लागते कसरत

न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला वर्गांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यात तर मागील वर्षी अत्यन्त कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासुनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कधी एकदा जून महिना येतो व पाऊस पडतो. अशा आशाळभूत नजरा आकाशाकडे लागलेल्या असताना बघता बघता जून महिना ही संपत आल्याने ऐन दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय येऊ लागला आहे. दर वर्षी प्रमाणे यंदा ही तीच गत होती का काय या चिंतेत सर्वच दिसत आहे.आमच्या प्रतिनिधीने परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला असता अनेक ठिकानी खाजगी शेतकरी यांनीच आपल्या शेतातील विहिरी त्यावरील विजेच्या मोटारी लोकांसाठी तसेच जनावरांना पाणी मिळावे म्हणून खुल्या करून दिल्या आहेत. असाच प्रकार प्रत्यक्ष पाहण्यात आला तो हिंगणे देहरे येथील शेतकरी शिवाजी संपत बच्छाव यांच्या शेतातील विहिरी वरून जवळच असलेल्या पिंपरी हवेली तांडा नंबर दोन येथील शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेत असल्याचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. या वरून ग्रामीण भागात पाण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो आहे. याची दाहकता समोर येते व अजून किती दिवस हा त्रास घ्यावा लागेल हे मात्र निसर्गाच्या मर्जीवरच अवलनबुन आहे असेच म्हणावे लागेल.दरम्यान चार महिन्या वर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतक्या दिवस पासून शांत असलेले सर्वच पुढारी अचानक जागे झाले असून सर्वानाच नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा व शहरातील नागरिकांच्या पाण्याची, कर्जाची, विम्याची, जनावरांची काळजी वाटू लागली त्यासाठी कोणी थेट मंत्रालयात बैठका घेऊ लागले? तर कोणी प्रत्यक्ष गावोगावी फिरून शेतकऱ्यांनाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहे. असे चित्र नांदगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.हीच तळमळ वेळीच दाखवली असती तर या नांदगाव मतदार संघातील कोणालाच या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला नसता तसेच अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे हैरान व्हावे लागले नसते येत्या काही दिवसात दमदार पाऊस पडला नाही तर मागील तीन वर्षांचा अनुभव शेतकरी सोबत नागरिकांच्या डोळ्यासमोर फिरत आहे. पुढे कसे होईल या चिंतेत संपूर्ण जनता पडली असून पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहे.