शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

हरसूलला माकपचा रास्ता रोको

By admin | Updated: November 14, 2015 23:19 IST

वाहतूक खोळंबली :सलग चौदा तास आंदोलन

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्याबरोबरच आदिवासींना त्यांच्या वनहक्क दाव्यांबाबतची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासह विविध मागण्यांसाठी शनिवार (दि.१४) हरसूल येथे माकपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माकपच्या या रास्ता रोको आंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.शनिवारी (दि.१४) सकाळी सात वाजेपासूनच हरसूलला माकपाच्या वतीने हरसूल येथे रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. ते रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे प्रांत बाळासाहेब वाकचौरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माकप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करावा, प्रत्येक गावात सरकारी भावात शेतीमालाची खरेदी सुरू करावी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यानुसार आदिवासींना वनहक्क कायद्यान्वये जमिनींचे वाटप करावे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची दुरवस्था दूर करून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा द्याव्यात. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दोन रुपये किलो दराने धान्य मिळाले पाहिजे, रेशन कार्ड नसलेल्यांना तत्काळ नवीन रेशन कार्ड देण्यात यावे, कृषी विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे यांसह विविध मागण्यांचा प्रांत बाळासाहेब वाकचौरे यांना दिलेल्या निवेदनात समावेश आहे. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व इरफान शेख, रमेश बरफ, तुकाराम मोंढे, हरदास मौले, भगवान चौधरी, शिवाजी तिदमे, भगवान बेंडकुळे, वेद काळू यांनी केले. रात्री उशिरा नऊ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते. (प्रतिनिधी)