शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 18:51 IST

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : रस्ता गेला खड्ड्यात ; वाहनचालक झाले त्रस्त !

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.पहिल्याच जोरदार पावसात महामार्गाची दयनीय दुरवस्था झाल्याने महामार्ग खड्डेमय बनला असून अपघातांना आमंत्रण देत आहे. याशिवाय ज्यांना कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्यांचे विकार होत आहेत, तर काही रुग्णांचे आजार वाढत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसात केलेली तात्पुरती मलमपट्टीचा पहिल्याच पावसात निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे.हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून रस्ताचा खड्डेमय बनला आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनधारकांना वाहन चालवतांना डोकेदुखी झाली आहे. तर प्रवाशांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खड्डे चुकवितांना अनेक लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या भागातील संपुर्ण महामार्गात खड्डे दिसून येत असल्याने महामार्गावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यामुळे महामार्ग असून अडचण नसून खोळंबा अशी अशी प्रवाशांची गत झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महत्वाचा आणि हरसूल सारख्या दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात नाळ जोडणाऱ्या हरसूल - नाशिक महामार्गाची एकमेव झालेली दुरवस्था लाजिरवाणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी याच भागात केलेली डागडुजी केव्हाच गायब झालीअसून महामार्ग गावरान रस्ता बनला असल्याचे चित्र दिसत आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महात्वाच्या रस्त्याकडे त्वरीत लक्ष देवून चांगल्या प्रकारे दुरुस्त करुन घ्यावा असे परीसरातील नागरीक व त्रस्त वाहन चालक करीत आहे.हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा जेमतेम ३ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे पडले आहे. यामुळे महामार्ग खड्याचा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचित करण्यात येऊन ही परिस्थिती जैसे थे आहे. त्याच बरोबर वाघेरा घाट धोकादायक स्थितीत आहे. रस्त्यांची मलमपट्टी खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा वेगळे पाऊल उचलावे लागेल.- रुपांजली माळेकर, जि.प.सदस्य, हरसूल गट.

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरroad safetyरस्ते सुरक्षा