शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 18:51 IST

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्दे त्र्यंबकेश्वर : रस्ता गेला खड्ड्यात ; वाहनचालक झाले त्रस्त !

त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे.पहिल्याच जोरदार पावसात महामार्गाची दयनीय दुरवस्था झाल्याने महामार्ग खड्डेमय बनला असून अपघातांना आमंत्रण देत आहे. याशिवाय ज्यांना कंबरदुखी, स्नायूंचे दुखणे, मणक्यांचे विकार होत आहेत, तर काही रुग्णांचे आजार वाढत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसात केलेली तात्पुरती मलमपट्टीचा पहिल्याच पावसात निघून गेल्याने रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला आहे.हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा महामार्गावर खड्डेच खड्डे पडले असून रस्ताचा खड्डेमय बनला आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहनधारकांना वाहन चालवतांना डोकेदुखी झाली आहे. तर प्रवाशांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे खड्डे चुकवितांना अनेक लहान मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या भागातील संपुर्ण महामार्गात खड्डे दिसून येत असल्याने महामार्गावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यामुळे महामार्ग असून अडचण नसून खोळंबा अशी अशी प्रवाशांची गत झाली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवत वाहन चालवतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या खड्ड्यांमुळे वाहन बिघडण्याचे, वाहनाचे पार्ट खिळखिळे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महत्वाचा आणि हरसूल सारख्या दळणवळणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात नाळ जोडणाऱ्या हरसूल - नाशिक महामार्गाची एकमेव झालेली दुरवस्था लाजिरवाणी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी याच भागात केलेली डागडुजी केव्हाच गायब झालीअसून महामार्ग गावरान रस्ता बनला असल्याचे चित्र दिसत आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महात्वाच्या रस्त्याकडे त्वरीत लक्ष देवून चांगल्या प्रकारे दुरुस्त करुन घ्यावा असे परीसरातील नागरीक व त्रस्त वाहन चालक करीत आहे.हरसूल - नाशिक महामार्गावरील कोणे ते वाघेरा जेमतेम ३ कि.मी. अंतरावर खड्डेच खड्डे पडले आहे. यामुळे महामार्ग खड्याचा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचित करण्यात येऊन ही परिस्थिती जैसे थे आहे. त्याच बरोबर वाघेरा घाट धोकादायक स्थितीत आहे. रस्त्यांची मलमपट्टी खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा वेगळे पाऊल उचलावे लागेल.- रुपांजली माळेकर, जि.प.सदस्य, हरसूल गट.

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरroad safetyरस्ते सुरक्षा