शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

हरणबारी ,केळझर मधून रब्बीसाठी दोन आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 16:50 IST

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देयेथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्यात आली .बैठकीस मालेगाव येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश चौधरी ,उपअभियंता ई.बी.शेवाळे ,उपअभियंता अभिजित रौंदळ,शाखा अभियंता आर.बी.सूर्

सटाणा:बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तन सोडण्याबाबत तसेच पिण्यासाठी अनुक्र मे ३९० व १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरिक्षत करण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्पातून सुमारे २ हजार १५ हेक्टर या रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते तर केळझर मध्यम प्रकल्पातून १ हजार१८० हेक्टर रब्बी क्षेत्राला पाणी दिले जाते .यंदा या रब्बी हंगामासाठी शेतकº्यांनी पाण्याच्या तीन आवर्तनाची मागणी केली होती .मात्र पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणात वाढ झाल्याने रब्बीसाठी दोनच आवर्तनाचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी कार्यकारी अभियंता चौधरी यांनी स्पष्ट केले .शेतकर्यांच्या मागणीनुसार हरणबारी धरणातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले असून२५० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात येणार आहे .उर्वरित पाण्याचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारीला सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .तर केळझर धरणातून येत्या १० फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.यासाठी १५४ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे .दरम्यान आमदार दिलीप बोरसे यांनी रब्बीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहचेल यासाठी आवश्यक ठिकाणी कालव्यांची दुरु स्ती करावी .तसेच रब्बी पिकासाठी ठरल्याप्रमाणे दिले जाणारे दोन्ही आवर्तने शेवटच्या शेतकº्याच्या शेत पर्यंत कसे पोहचेल यासाठी नियोजन करावे .जेणेकरून पेरा केले पिक हातात येईल अशा सूचना यावेळी संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या .बैठकीस आदर्श गाव किकवारीचे प्रणेते केदाबापू काकुळते ,बाळासाहेब भदाणे ,पांडुरंग सोनवणे ,माधवराव सोनवणे ,जनार्दन सोनवणे ,भास्कर सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते .असा आहे रब्बीचा सिंचन आराखडा ...हरणबारी धरण पाणी साठा ११६६ दशलक्ष घनफूट ,पैकी बाष्पीभवन तुट ११७ दशलक्ष घनफूट ,पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ३९० दशलक्ष घनफूट ,रब्बी हंगामासाठी ६५९ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे.केळझर धरणात ५७२ दशलक्ष घनफूट पाणी साठा आहे .पैकी बाष्पीभवन तुट ८६ दशलक्ष घनफूट ,पिण्यासाठी १०१ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले आहे . ३८५दशलक्ष घनफूट पाणी रब्बीसाठी आरिक्षत करण्यात आले आहे .