शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हॅपी बर्थ डे, पंचवटी एक्स्प्रेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:14 IST

बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस...

नाशिकरोड : बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस... कुटुंबातील सदस्यांचा किंवा कोणा मित्रमंडळीचा वाढदिवस साजरा करावा असाच हा क्षण होता. गेल्या ४२ वर्षांपासून चाकरमाने, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणारी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेच कुटुंबातील सदस्याचा भासावा, अशा पध्दतीचा दिमाखदार वाढदिवस सोहळा पार पाडला.  सकाळी साजरा झालेल्या या सोहळ्यासाठी खास पंचवटी एक्स्प्रेसची प्रतिकृती असलेला केक तयार करण्यात आला होता. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, स्टेशन अधीक्षक एम. बी. सक्सेना यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच खासदार गोडसे यांच्या हस्ते पंचवटी रेल्वेचालक आणि गार्ड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इंजिनला फुलांचे हार लावून सजविण्यात आले होते.  या सोहळ्यासाठी रेल परिषदेचे बिपीन गांधी, देवीदास पंडित, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक जुबेर पठाण, किरण बोरसे, दिलीप सातपुते, संजय केदारे, कैलास बर्वे, इजाज शेख, धनंजय कुशारे, राजेंद्र पाटील, तानाजी गायधनी, चेतन बुरकुल, गोपाळ नाईक, नितीन जगताप, दत्ता गोसावी, प्रसाद पवार, पवन शिंदे, संजय शिंदे, सागर सोनवणे, बाळा गायकवाड आदींसह प्रवासी उपस्थित होते. १९७५ ला हिरवा झेंडा १ नोव्हेंबर १९७५ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस अविरत धावत आहे. सुरुवातीला १९ डब्यांची असलेल्या या रेल्वेला कालांतराने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २१ डबे करण्यात आले.नाशिकचे अतुट नाते पंचवटी आणि नाशिककरांचे गेल्या ४२ वर्षांपासून अतूट आणि भाविनक असे नाते आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे आणि मुंबईहून नाशिकमध्ये येणारे चाकारमानांबरोबरच आप्तेष्टही पंचवटी एक्स्प्रेसमधूनच प्रवास करतात. त्यामुळेच सुखदु:खाच्या कोणत्याही कामांचे नियोजन पंचवटीच्या वेळेनुसार आखले जाते हे विशेष. पंचवटीच्या पासधारक बोगीमधून प्रवास करणाºया प्रवाशांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.