शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

कीटकनाशके काळजीपूर्वक हाताळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:32 IST

नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत शेतकºयांना कीटकनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केले असून, रासायनिक खते, कीटकनाशके व औषध विक्रेत्यांनी शेतकºयांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकृषी विभाग : औषध विक्रे त्यांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना

नाशिक : शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊ नये आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेत शेतकºयांना कीटकनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केले असून, रासायनिक खते, कीटकनाशके व औषध विक्रेत्यांनी शेतकºयांना संरक्षक किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.शेतातील वेगवेगळ्या पिकात फवारणी करताना कीटकनाशक नाक, त्वचा, तोंडाद्वारे शरीरात गेल्याने विषबाधा होत असल्याच्या घटना नाशिक जिल्ह्णातही काहीवेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे फवारणी करताना शिफारशीप्रमाणे योग्य प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करावा. शिफारस नसताना दोन व दोन पेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करण्यात येऊ नये. कीटकनाशकांची फवारणी करणाºया शेतकºयांनी संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्कचा वापर करावा. शरीरावर जखमा किंवा आजारी असल्यास फवारणी करणे टाळावे.अपघाताने विषबाधेची दुर्घटना घडल्यास तत्काळ प्रथमोचार करावेत व विनाविलंब बाधित रु ग्णास जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे अशा सूचना कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आल्या आहेत.दरम्यान, राज्यातील सर्व कीटकनाशके विके्र त्यांनी कीटकनाशकांची विक्र ी करताना संरक्षित किट उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत. तसेच अतिरिक्त संरक्षित किट विक्र ीसाठीही उपलब्ध ठेवण्यात यावेत, असे निर्देश कृषी संचालकांतर्फे करण्यात आले आहेत.मजुरांनाही संरक्षक किट द्याशेतकरी/शेतमालक मजुराकडून फवारणी करून घेतात. अशावेळी शेतकरी/ शेतमालकाने नैतिक जबाबदारी पाळून फवारणी करणाºया शेतमजुरास संपूर्ण शरीर झाकले जाईल असे सरंक्षण किट द्यावे व फवारणी समक्ष करून घेण्यात यावी. विषबाधेची लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात घेऊन जावे. तसेच अशा विषबाधेची माहिती तत्काळ ग्रामपंचायत, पोलीसपाटील, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व जवळच्या पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र