शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हमरीतुमरी : पिंपळगाव वाखारी येथे विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:45 IST

ग्रामसभेत बाचाबाची

पिंपळगाव वाखारी : ग्रामपंचायतीची ग्रामसभा वनीकरणातील जंगलाची अवैध वृक्षतोड व अतिक्रमण या दोन मुद्द्यांवर वादळी झाली. वादळी चर्चेचे रूपांतर बाचाबाची व हमरीतुमरीत झाल्याने अनेक विषय चर्चेविना अपुरे राहिले.सरपंच उत्तम जाधव व उपसरपंच प्रल्हाद पाटील यांच्या उपस्थितीत झालेली ग्रामसभा तरुणांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वादळी ठरली. प्रारंभी रोजगार हमी योजना, कृषी योजना, पशुवैद्यकीय योजना, इंदिरा आवास योजना, वस्तीसुधार योजना आदिंबाबत ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी माहिती दिली. त्यानंतर ३०० हेक्टर क्षेत्रांतील वनविभागाच्या वनीकरणावर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणाचा विषय व अवैध होणारी वृक्षतोड याबाबत ज्ञानेश्वर कदम यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर ग्रामपंचायत वनविभाग व वनरक्षक समिती यांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड व अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. फक्त २८ लाभार्थी आदिवासींना वनजमीन मिळणार असल्याने इतर अतिक्रमित कुटुंबांना हाकलण्याचे प्रयत्न होण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेत तसा ठराव संमत करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या चोरीच्या विषयावरही वादळी चर्चा झाली. चर्चेत दिलीप पाटील, ग्यानदेव वाघ, नदिश थोरात, विनायक वाघ, ज्ञानेश्वर कदम, अमोल अहिरे, नंदू वाघ, ना.ता. अहिरे यांनी भाग घेतला. (वार्ताहर)