शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

सहामाही परीक्षा दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:59 IST

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षापासून महाराष्टÑ विद्या प्राधिकरणमार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात पायाभूत चाचणी झाल्यानंतर दोन महिन्यात विद्यार्थ्यांची व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ठरवून अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी शिक्षकांनी करवून घ्यावी जेणे करून दसºयानंतर व दिवाळीपूर्वी होणाºया सहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षेत विद्यार्थी निपुण व्हावेत हा हेतू आहे. त्यासाठी गेल्या वर्षी भाषा व गणित या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणने सर्वच शासकीय व खासगी विद्यालयांना पुरविल्या होत्या. यंदा मात्र दोनऐवजी चार विषयांच्या म्हणजेच भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणमार्फतच पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. परंतु यंदा राज्य सरकारच्या व विद्या प्राधिकरणच्या उदासीनतेमुळे राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. ज्या पायाभूत चाचणी परीक्षा जुलै महिन्यात होणे अपेक्षित होते, त्यांच्या प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे त्या थेट दोन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सर्वच शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. शाळांच्या शिक्षकांनी सप्टेंबर महिन्यातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून आपला निकाल शाळांना व केंद्र प्रमुखांना कळवून टाकला. मात्र परीक्षाच उशिरा झाल्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच तडा गेला आहे. सुटीचा आनंद हिरावलासहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षा आता ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. महापालिका, खासगी शाळांना येत्या १४ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असून, ४ नोव्हेंबर रोजी सुट्या संपतील. ५ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. ६ रोजी शाळांना सुरुवात होईल व दुसºयाच दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.