शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सहामाही परीक्षा दिवाळीनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:59 IST

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्याने थेट नोव्हेंबर महिन्यातच सहामाही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्याऐवजी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’ उपक्रमांतर्गत गेल्या वर्षापासून महाराष्टÑ विद्या प्राधिकरणमार्फत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात पायाभूत चाचणी झाल्यानंतर दोन महिन्यात विद्यार्थ्यांची व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता ठरवून अभ्यासात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी शिक्षकांनी करवून घ्यावी जेणे करून दसºयानंतर व दिवाळीपूर्वी होणाºया सहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षेत विद्यार्थी निपुण व्हावेत हा हेतू आहे. त्यासाठी गेल्या वर्षी भाषा व गणित या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणने सर्वच शासकीय व खासगी विद्यालयांना पुरविल्या होत्या. यंदा मात्र दोनऐवजी चार विषयांच्या म्हणजेच भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांच्या प्रश्नपत्रिका विद्या प्राधिकरणमार्फतच पुरविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. परंतु यंदा राज्य सरकारच्या व विद्या प्राधिकरणच्या उदासीनतेमुळे राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रकच कोलमडून पडले आहे. ज्या पायाभूत चाचणी परीक्षा जुलै महिन्यात होणे अपेक्षित होते, त्यांच्या प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे त्या थेट दोन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या. सप्टेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात सर्वच शाळांमध्ये पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात आली. शाळांच्या शिक्षकांनी सप्टेंबर महिन्यातच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून आपला निकाल शाळांना व केंद्र प्रमुखांना कळवून टाकला. मात्र परीक्षाच उशिरा झाल्याने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या मूळ हेतूलाच तडा गेला आहे. सुटीचा आनंद हिरावलासहामाही अर्थात संकलित मूल्यमापन परीक्षा आता ७ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. महापालिका, खासगी शाळांना येत्या १४ आॅक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार असून, ४ नोव्हेंबर रोजी सुट्या संपतील. ५ रोजी रविवार असल्यामुळे सोमवार, दि. ६ रोजी शाळांना सुरुवात होईल व दुसºयाच दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दिवाळीच्या सुटीत विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.