शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

पंधरा दिवसांपासून निम्मे गाव अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:00 IST

ठाणगाव : येथे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. खंडीत झालेल्या वीज पुरवठयामुळे निम्मे गाव पंधरा दिवसापासून अंधारात आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या वतीने सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे .

सिन्नर-आडवाडी रस्त्यालगत असणारी रोहित्रावरील महत्त्वाचे भाग कायम झाले आहेत. केवळ सिंगल फ्रेजसाठी तयार केलेल्या २५ केव्हीच्या गट्टूवरच या निम्म्या गावाची वीज अवलंबून असून आठ दिवसांपासून तीन गट्ट्यांमधील दोन गट्टू जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. या भागातील ट्रान्सफार्मरच कुठे गायब झाला याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. ट्रान्सफार्मर नसतांना इतके दिवस वीज पुरवठा कसा सुरळीत होता असा प्रश्न ग्रामस्थात उपस्थित केला जात आहे. दिवसा वीज सुरळीत असते मात्र रात्र झाली की, या निम्म्या भागातील वीज पुरवठा खंडित होतो. अनियमित वीजपुरवठ्याबाबत रामहरी रेवगडे, नितिन पाटोळे, नवनाथ पाटोळे, शिवाजी पाटोळे, आंनदा गाडेकर, मंहेद्र शिंदे, गणेश लांडगे, विजय केदार, संतोष शिंदे, भगवान शिरसाठ या ग्रामस्थांनी ठाणगाव येथील सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिले. निवेदन देऊनही परिस्थितीत काहीही बदल न झाल्याने निम्म्या गावातील ग्रामस्थ सिन्नर येथील वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कैफियत मांडणार आहेत.

टॅग्स :electricityवीज