शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

निम्मे रेशन दुकानदार संपातून बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:43 IST

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

नाशिक : तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात अन्नधान्य महामंडळ स्थापन करावे व रेशन दुकानदारांना दरमहा ४० हजार रुपये मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्य रेशन दुकानदार संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपातून नाशिक जिल्ह्णातील निम्मे रेशन दुकानदार बाहेर पडले असून, त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली आहे.विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्णात रेशन दुकानदार संघटनेचे नेतृत्व करणाºया जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्या नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारांनी शनिवारी धान्य उचलण्यासाठी पुरवठा खात्यात चलने भरल्यामुळे या संपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. राज्यातील रेशन दुकानदारांनी १ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला असला तरी, नाशिक शहरातील सुमारे दोनशेहून अधिक दुकानदारांनी सरकारसोबत सकारात्मक चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा व्यक्त करून संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्णातील रेशन दुकानदारांनी संप यशस्वी करण्याचा चंग बांधला होता व त्यादृष्टीने गावोगावी बैठका घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार संप सुरू होऊन आता पाच दिवस लोटले असून, सरकारकडून अद्याप त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. रविवार व सोमवारी विधीमंडळ अधिवेशनाला सुटी असल्यामुळे मंगळवारनंतरच संपावर तोडगा निघू शकतो हे स्पष्ट झाल्यामुळे रेशन दुकानदारांचा धीर सुटत चालला आहे. महिन्याचा पहिलाच आठवडा असल्याने रेशनवरील धान्य विक्रीसाठी हा आठवडा महत्त्वाचा असतो त्यामुळे बºयाचशा रेशन दुकानदारांनी संपाकडे पाठ फिरवून दुकाने सुरू केली आहेत. नाशिक जिल्ह्णात २६०९ रेशन दुकानदार असून, त्यापैकी १५०६ दुकानदार संपात सहभागी झाले असून, नाशिक, सिन्नर, नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यातील दुकाने पूर्ववत सुरू झाले आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी काही दुकानदार संपातून बाहेर पडण्याची शक्यता गृहीत धरून पुरवठा खात्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सबुरीची भूमिका घेतली आहे, तर काही दुकानदारांनी कारवाईच्या भीतीपोटी संपातून माघार घेतली आहे. मात्र प्रशासन रेशन दुकानदारांवर दडपण आणत असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहेत.