शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

बाधितांंच्या तुलनेत दीडपट कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तुलनेत बुधवारी (दि. ५) सुमारे दीडपट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात २७९५ इतक्या रुग्णांची वाढ ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या तुलनेत बुधवारी (दि. ५) सुमारे दीडपट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात २७९५ इतक्या रुग्णांची वाढ झाली असून ४,०६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ४१ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३,८२५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १,४२९ तर नाशिक ग्रामीणला १,२९८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १७ व जिल्हाबाह्य ५१ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १०, ग्रामीणला ३० , मालेगाव मनपात १ असा एकूण ४१ जणांचा बळी गेला आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने चाळीसच्या आसपास होती. त्यात गत आठवड्याच्या उत्तरार्धात काहीशी घट झाली होती. मात्र, गत तीन दिवस पुन्हा मृतांच्या आकड्यात काहीशी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

कोरोनामुक्तचे प्रमाण ८९ टक्क्यांवर

जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ती ८९.५० टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९१.५८ टक्के, नाशिक शहर ९१.६२, नाशिक ग्रामीण ८६.४३ तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८४.४१ टक्क्यांवर पाेहोचला आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल ५ हजारांवर

जिल्ह्यात प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ५,३७० वर पोहोचलेली आहे. त्यात सर्वाधिक ३,३९३ इतके अहवाल ग्रामीण भागाचे प्रलंबित असून, १,५७७ अहवाल नाशिक शहराचे तर मालेगाव मनपाचे ४०० असे एकूण ५,३७० अहवाल प्रलंबित आहेत.