शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे शहर पाच तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:40 IST

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.

ठळक मुद्देतांत्रिक बिघाड : करंट ट्रान्सफार्मरला आग; पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीतशहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत

नाशिक : टाकळी सबस्टेशनजवळील करंट ट्रान्सफार्मरला आग लागून तो फुटल्यामुळे सीबीएस, शालिमार, अशोकस्तंभ, द्वारका आणि टाकळी या मध्यवर्ती परिसरातील वीज सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ गायब झाल्याने येथील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सायंकाळी साडेसहाला खंडित झालेला वीज पुरवठा रात्री साडेअकरा वाजेपर्यंतही सुरळीत होऊ शकला नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते.उन्हामुळे नाशिककर हैराण झालेले असतानाच सायंकाळी विजेअभावी रस्त्यावरील पथदीप व घरातील दिवेही बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शहर विभाग-१ अंतर्गत येणाऱ्या टाकळी सबस्टेशन येथे सायंकाळी करंट ट्रान्सफार्मर (सीटी)ला आग लागल्यामुळे अनेक फिडर्सवरील वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे सीबीएस, शालिमार, एम.जी.रोड, गंगापूररोड आणि शरणपूररोडचा काही परिसर, गंजमाळ, द्वारका, काठेगल्ली , जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तासांपेक्षा अधिक काळ खंडित होता.सिडको, सातपूरला वीज गायबसायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यामुळे सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटीसह परिसरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. टाकळी येथील केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे निम्मे शहर अंधारात असताना सायंकाळी झालेल्या पावसामुळेदेखील अनेक भागांतील खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर पडली.दोन्ही विभागातील फिडर्स प्रभावित सिटीला लागलेल्या आगीमुळे शहरातील बहुतांश भागातील फिडर्सला वीजपुरवठा होऊ न शकल्याने या फिडर्सवरील वीजग्राहकांचादेखील वीजपुरवठा खंडित झाला. शहर विभाग-१ आणि शहर विभाग-२ अशा दोन्ही विभागाला सीटीबस्टचा परिणाम सहन करावा लागला.सायंकाळच्या सुमारास ऐन बाजारपेठेतील वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. तर रहिवासी क्षेत्रातही वीज गायब झाल्याने नागरिकांना वीज कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागली. परंतु नेहमीप्रमाणेच ग्राहकांना कुठूनही पुरेशी माहिती मिळत नसल्याने वीज कधी येणार याची वाट ग्राहकांना रात्री १० वाजेपर्यंत पहावी लागली. रात्री साडेनऊ नंतर शहरातील बºयापैकी भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होण्यास सुरुवात झाली.